AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चार वर्षात एकही प्रश्न नाही, भाजपचे सर्वाधिक 52 नगरसेवक गप्प, नागपूर मनपात तब्बल 68 नगरसेवक ‘मौनी’

नागपूर महापालिकेतील 68 नगरसेवक मौनी नगरसेवक ठरले आहेत. या नगरसेवकांनी गेल्या 4 वर्षात सभागृहात एकही प्रश्न विचारलेला नाही. यात सर्वाधिक भाजपचे 52 तर काँग्रेसचे 12 आणि बसपाचे 4 नगरसेवक आहेत.

चार वर्षात एकही प्रश्न नाही, भाजपचे सर्वाधिक 52 नगरसेवक गप्प, नागपूर मनपात तब्बल 68 नगरसेवक 'मौनी'
नागपूर महापालिका
| Edited By: | Updated on: Aug 12, 2021 | 8:55 AM
Share

नागपूर : नागपूर महापालिकेतील (Nagpur municipal Carporation) 68 नगरसेवक मौनी नगरसेवक ठरले आहेत. या नगरसेवकांनी गेल्या 4 वर्षात सभागृहात एकही प्रश्न विचारलेला नाही. यात सर्वाधिक भाजपचे 52 तर काँग्रेसचे 12 आणि बसपाचे 4 नगरसेवक आहेत. ज्या उद्देशानं नागरिक नगरसेवकांना निवडून देतात त्या उद्देशालाच या नगरसेवकांनी हरताळ फसलाय.

नागपूर महापालिकेत एकूण 151 नगरसेवक आहेत. प्रभागातील समस्या, प्रश्न सोडविण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवाराला मतदार निवडून देत असतात. निवडून आलेल्या नगरसेवकांनी सभागृहात प्रश्न मांडून ते सोडवावेत, अशी सामान्य जनतेला अपेक्षा असते. मात्र, नागपूर महापालिकेतील 68 नगरसेवक असे आहेत ज्यांनी चार वर्षात सभागृहात तोंडच उघडलं नाही.

भाजपचे सर्वाधिक 52 मौनी नगरसेवक

चार वर्षात त्यांनी एकही प्रश्न विचारला नाही. याध्ये महापालिकेत सत्तापक्ष असलेल्या भाजपचे सर्वाधिक 52 नगरसेवक आहेत. त्याखालोखाल काँग्रेसचे 12 आणि बसपाचे 4 नगरसेवक आहेत. जनतेचे प्रश्न न मांडणाऱ्या आणि न सोडविणाऱ्या नगरसेवकांना पुन्हा पुन्हा तिकीटच देऊ नये, अशी मागणी आता होतेय तर पक्षाकडून सावरासावर करण्याचा प्रयत्न केला जातोय.

राजकीय पक्षांचे आरोप प्रत्यारोप

भाजप गेल्या 15 वर्षांपासून महापालिकेत सत्तेत आहे. मात्र, तरीही शहरातील समस्या सुटल्या नाहीत, प्रश्न कायम आहेत. आम्ही खूप काम केलं, असा दावा भाजपकडून वारंवार केला जातो. मात्र, सभागृहात भाजपचे नगरसेवक मौन धारण करतात, त्यामुळं कुठलेही प्रश्न मार्गी लावत नाही, हे माहितीवरून दिसत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.

नगरसेवकांच्या निष्क्रियतेमुळं शहरातील प्रश्न अजूनही कायम

नागपूर उपराजधानीचं शहर असलं तरी शहराचा हवा तसा विकास झालेला नाही. काही नगरसेवकांच्या निष्क्रियतेमुळं शहरातील अजूनही प्रश्न कायम आहेत. त्यामुळं या नगरसेवकांनी मौन सोडून सभागृहात प्रश्न मांडने अपेक्षित आहे.

(Nagpur Municipal Corporation 68 corporators have not asked a single question in last four years)

हे ही वाचा :

Corona Update : 11 जिल्ह्यात एकही मृत्यू नाही, रुग्णसंख्येतही मोठी घट!

नागपूरमधल्या शाळांमध्ये लगबग सुरु; शिक्षकांचं लसीकरण, वर्गखोल्यांचं सॅनिटायझेशन, बेंचेसमध्ये ठराविक अंतर!

नागपूरच्या तांदूळ घोटाळ्यात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता, रेशन दुकानदार संघटना फडणवीसांच्या भेटीला

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...