AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यांना तर मुख्यमंत्री व्हायचं होतं पण..; निवडणुकीतील यशानंतर भाजप नेत्याचा नाना पटोलेंवर निशाणा

Sudhir Mungantiwar on Congress Leader Nana Patole : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. यात महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे. तसंच काँग्रेसवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. वाचा सविस्तर...

यांना तर मुख्यमंत्री व्हायचं होतं पण..; निवडणुकीतील यशानंतर भाजप नेत्याचा नाना पटोलेंवर निशाणा
नाना पटोले
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Nov 24, 2024 | 9:12 AM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. यात महायुतीला भरघोस यश मिळालं. महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. अनेक दिग्गजांचा या निवडणुकीत पराभव झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा निसटता विजय झाला. निकालाआधी महाविकास आघाडीचं सरकार आल्यास ज्या लोकांची नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत होतं. त्यामुळे नाना पटोलेंच्या नावाचा समावेश होता. यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे. नाना पटोले हे मुख्यमंत्री होण्याच्या गोष्टी करत होते. आता ते विरोधी पक्षनेते बनू शकत नाहीत. त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावला आहे.

मुनगंटीवार यांचा महाविकास आघाडीला टोला

महाविकास आघाडीला लोकसभा निवडणूक घेतल्यानंतर अहंकार होता. सरकार दूर दूर पर्यंत येण्याची चिन्ह नसताना मी भावी गृहमंत्री, मी भावी महसूल मंत्री अशा पद्धतीची भाषा होती. विजय नम्रतेने स्वीकारला नाही तर हा विजय पराभवाच्या मार्गाने पुढे जातो, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी संविधानाचा सन्मान करावा लागतो. दहा टक्के पेक्षा कमी जागा निवडून आल्याने विरोध करू शकत नाही. संविधानाचा सन्मान करावा लागेल. काँग्रेसचे निवडून आलेले आमदार बेचैन असणार आहे, असं मुनगंटीवार म्हणालेत.

उद्धव ठाकरेंना टोला

धूल थी चेहरे पे आयना साफ करते रहे… आपण जे पेरतो आहेय आपल्याच नशिबात आपल्याच वाटेला येईल असं कधी विरोधकांना वाटलं नाही. ज्या पद्धतीने बेइमाने पेरली जनतेने तेच व्याजासकट पराभव स्वरूपात परत केलं. उद्धव ठाकरे यांनी औट घटकेचे राज्य करून काय केलं. त्याचा काय फायदा झाला. त्यांचा नावावर मुख्यमंत्री कसा वागू नये एवढेच त्यांच्या नावावर आज जमा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

काँग्रेसने 8500 सांगितले तरीही नाकारले. देशात जनतेने त्यांना मत दिले नाही. कारण काँग्रेस बद्दल विश्वास नाही. काँग्रेस एक धोका आहे. हे लोकांना वाटतं काँग्रेसने 30 हजार देतो म्हटलं असतं तरी त्यावर कोणी विश्वास ठेवला नसता. या अगोदर त्याच पद्धतीने कर्नाटकमध्ये धोका केला. हिमाचलमध्ये धोका केला त्यांची नीती साफ नाही आहे, असं म्हणत मुनगंटीवार यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण