AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: जितेंद्र आव्हाडांचं विधान समाजात तेढ निर्माण करणारं, शरद पवारांनी आव्हाडांचा राजीनामा घ्यावा; बावनकुळेंची मागणी

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंडल आंदोलनातील ओबीसींच्या सहभागावरून केलेल्या विधानाचे अजूनही पडसाद उमटताना दिसत आहेत.

VIDEO: जितेंद्र आव्हाडांचं विधान समाजात तेढ निर्माण करणारं, शरद पवारांनी आव्हाडांचा राजीनामा घ्यावा; बावनकुळेंची मागणी
ओबीसी आरक्षणासाठीचा नवा कायदा ही सरकारची नौटंकी; चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
| Edited By: | Updated on: Jan 04, 2022 | 1:37 PM
Share

नागपूर: राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंडल आंदोलनातील ओबीसींच्या सहभागावरून केलेल्या विधानाचे अजूनही पडसाद उमटताना दिसत आहेत. आता भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आव्हाडांचं हे विधान दोन समाजात तेढ निर्माण करणारं असल्याचं सांगत आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काल अत्यंत निंदनीय वक्तव्य केलं. समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे हे वक्तव्य आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या मंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. तसेच आव्हाड यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी, अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.

राज्य सरकारचा दोन वर्ष टाइमपास

राज्य सरकारच्या ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत मी मध्यस्थी याचिका दाखल केली आहे. येत्या 19 तारखेला या मध्यस्थी याचिकेवर सुनावणी होणार आहेय सर्वोच्च न्यायालयातून ओबीसी समाजाला न्याय मिळेल अशी आशा आहे. दोन वर्षे राज्य सरकारने टाईमपास केला आहे. धनदांडग्या लोकांना ओबीसी समाजाच्या जागांवर निवडणूक लढवण्याचा राज्य सरकारचा कट आहे. राज्य सरकारने जाणीवपूर्वक चुकीचा अध्यादेश काढला असून या अध्यादेशात एक हजार चूका आहेत, असं ते म्हणाले.

नागपूर जिल्ह्याला पालकमंत्री आहेत का?

नागपूर जिल्ह्याला पालकमंत्री आहेत का? पालकमंत्र्यांचं अस्तित्व कुठे आहे?, असा सवाल करतानाच पालकमंत्र्यांपासून नागपूर जिल्हा वंचित आहेत, याकडे त्यांनी लक्ष द्यावं. मी पालमंत्री असताना डीपीडीसीतले सर्व पैसे खर्च व्हायचे. नागपूरात आता समाजकल्याणच्या कामात गैरप्रकार होत आहे. निधीचं समान वाटप झालं नाही तर न्यायालयात जावं लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या समाज योगदानाबाबत नोंद घ्यावी असं पत्र पुन्हा केंद्र सरकारकडे पाठवू, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Eknath Shinde Corona: मंत्री एकनाथ शिंदेंना कोरोनाची लागण, संपर्कातील सर्वांनी चाचणी करुन घेण्याचे आवाहन!

Coronavirus: बाजार ते लग्न… गर्दीत जाणं टाळा; महापौर किशोरी पेडणेकरांचं मुंबईकरांना कळकळीचं आवाहन

एक गोळी कोरोनावर गुणकारी, पाच दिवसांचा कोर्स 1399 रुपयांमध्ये; नवी गोळी मार्केटमध्ये दाखल

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.