AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video Sanjay Raut | हिंदुत्वाच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचं लक्ष्य, मुख्यमंत्रीही करणार विदर्भाचा दौरा; संजय राऊतांची घोषणा

शिवसेनेनं आता नागपूरवर लक्ष केंद्रित केलंय. विदर्भात पाय रोवायचे असतील तर नागपूर हा हिंदुत्वाचा गड आहे. शिवाय नागपूर महापालिकेची निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्याकडं नागपूरची जबाबदारी देण्यात आली आहे.

Video Sanjay Raut | हिंदुत्वाच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचं लक्ष्य, मुख्यमंत्रीही करणार विदर्भाचा दौरा; संजय राऊतांची घोषणा
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत. Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Apr 21, 2022 | 11:29 AM
Share

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, लवकरचं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) पक्षाच्या कामासाठी बाहेर पडणार आहेत. नागपुरात संघटनात्मक बदल करण्यासाठी त्यांच्या सूचना आहेत. विदर्भात सेना वाढवायची असेल तर नागपुरात पक्ष मजबूत करावे लागेल. आदित्य ठाकरे हेसुद्धा नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. पक्षसंघटनेच्या कामाचा आढावा घेतील. विदर्भात अनेक जिल्ह्यात संघटनात्मक बदल (organizational changes) करावे लागणार आहेत. उध्दव ठाकरे स्वतः आता पक्षाच्या कार्यात लक्ष घालणार आहेत. विदर्भ हा महाराष्ट्राचा महत्वाचा हिस्सा आहे. इथं आमचे आमदार, खासदार आहेत. 2024 ची तयारी आतापासून सुरू करायची आहे. त्यामुळं नागपूरवर लक्ष केंद्रित करावं लागेल. नागपूर हा हिंदुत्वाचा गड राहिलेला आहे. शिवसेनेला इथंही आपला झेंडा गाडायचा आहे. नागपुरात महापालिकेची निवडणूक (Municipal Corporation elections in Nagpur) आहे. या सर्व गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल, असंही संजय राऊत म्हणाले.

उद्योगपत्यांना भाजपने देश विकला

पोलिसांच्या बदल्या हा गृह खात्याचा अंतर्गत विषय आहे. त्यावर काही बोलणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. दिशाभुल केल्यामुळे एसटीचा संप लाबंला असल्याचंही त्यांनी सांगितलं. लालपरी धावू लागली आहे. त्याचा आम्हाला आनंद आहे. महाराष्ट्रात राजकीय सभा खूप होतात. सर्वचं सभेवर लक्ष द्यायचं नसते. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या सभेवर दिली. भाजपने जवळ जवळ सर्व देश विकला आहे. केंद्र सरकारने अनेक उपक्रम विकले. मर्जीतल्या उद्योगपत्यांना भाजपने देश विकला, असल्याची टीका संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली.

किरीट सोमय्यांवर कारवाई होणारच

राऊत म्हणाले, काल आयोध्या दौऱ्याबद्दल माझी मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंशी चर्चा झाली. आयएनएस विक्रांत हा मोठा घोटाळा आहे. कोणी बाहेर येऊन बडबड केली. लोकांना चुकीची माहिती दिली. तरी कारवाई मात्र होणारचं आहे. आम्ही पुराव्यासह बोललो आहोत. राजभवनातून आलेले पत्र हा सर्वात मोठा पुरावा आहे. आमच्यावर आरोप करून तुमचे आरोप धुतल्या जाणार नाहीत. आम्ही पुराव्यासहीत आरोप केले आहेत. हवेत गोळीबार केले नाहीत, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांची किरीट सोमय्यांवर दिली.

Nagpur : नागपूरमध्ये विनाहेल्मेट सरकारी बाबूंवर आजपासून कारवाई, राज्याच्या परिवहन आयुक्तांचे आदेश

Amravati | अचलपूरमधील दोन गटांतील दगडफेक प्रकरण, भाजप शहराध्यक्ष अभय माथनेला तीन दिवस पोलीस कोठडी

Video Nagpur Fire | नागपुरात भरदुपारी दुचाकी पेटली; महाकाली चौकात धुराचे लोळ

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.