AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उदय सामंत यांच्या भ्रष्टाचाराच्या एकूण फायली किती?; संजय राऊत यांनी आकडाच सांगितला

मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी कराच. मग आम्ही बघतो. मुंबईत कानडी बांधवांवर अत्याचार होत नाहीत. मुंबईत सर्व देश सामावला आहे.

उदय सामंत यांच्या भ्रष्टाचाराच्या एकूण फायली किती?; संजय राऊत यांनी आकडाच सांगितला
उदय सामंत यांच्या भ्रष्टाचाराच्या एकूण फायली किती?; संजय राऊत यांनी आकडाच सांगितलाImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 28, 2022 | 11:53 AM
Share

नागपूर: राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. या मुद्द्यावरून संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहे. राऊत यांनी आज राज्याचे मंत्री उदय सामंत यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. उदय सामंत यांच्या नाही 25 फायली आमच्याकडे पडून आहेत. त्या आम्ही सभागृहात मांडणार होतो. पण सीमावादाचा ठराव असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणताही इतर विषय आणू नका असं सांगितलं म्हणून आम्ही थांबलो, असं संजय राऊत म्हणाले. मात्र, या फायली कोणत्या भ्रष्टाचाराच्या आहेत हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. परंतु, राऊत यांच्या या नव्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.

एकाच गटाच्या मंत्र्यांच्या फायली बाहेर येत आहेत. ही सर्व प्रकरणं गंभीर आहेत. तुम्ही म्हणता आम्ही बॉम्ब फोडावा. मग हे फुटत आहे ते काय आहे? एनआयटी घोटाळा हे टोकन आहे, भ्रष्टाचाराची प्रकरणं अजूनही येईतील, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राठोड यांच्या दोन जमिनीचे भ्रष्टाचार, सत्तार यांची कलेक्शनगिरी, त्यांनी 36 एकर गायरान जमीन देऊन टाकली, ही सुरुवात आहे. उदय सामंत यांचं एक प्रकरण नाही. आमच्या खोलीत सामंतांची 25 प्रकरणं पडली आहेत. पण सीमा प्रश्नाचा ठराव महत्त्वाचा होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सांगितलं इतर विषय घेऊ नका. अनेक प्रकरणं आहेत. ही प्रकरणं देणारे भाजपचेच लोक आहेत, असं राऊत म्हणाले.

सरकारमधील लोक सामान्यांच्या जमिनी कुणाच्या तरी घशात घालत असतील तर त्यावर विरोधकांनी बोललंच पाहिजे. त्यामुळेच आम्ही बोलत आहोत. जयंत पाटलांनी जो शब्द वापरला, निर्लज्ज सरकार, गेंड्याच्या कातड्याचे सरकार आहे हे. आमच्यावर कितीही आरोप करा आम्ही खुर्च्यांना चिटकून राहू. आमच्यात नैतिकता नाही, अशा पद्धतीने वागणारं हे सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली.

थोडी जरी नैतिकता असती तर मुख्यमंत्र्यानी चार मंत्र्यांचे राजीनामे घेतले असते. पण हे सर्वच बोगस आहेत. त्यांची डिग्रीच काय? यांचं अस्तित्वही बोगस आहे. हे सर्व डिस्क्वॉलिफाय होतील, असा दावाही त्यांनी केला.

ठामपणे सांगतो. शिवसेनेच्या आमदारांना बोलू द्यायचं नाही. विरोधी पक्षाचा आवाज दाबायचा. विधानसभा अध्यक्षांनी पक्षपात करू नये. हा लोकशाहीचा देश आहे. तुम्ही घटनात्मक खुर्चीवर बसून विरोधी पक्षांचा आवाज दाबत असाल तर काय बोलणार? जयंत पाटील यांनी जो संताप व्यक्त केला तो महाराष्ट्राचा संताप आहे, असंही ते म्हणाले.

मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी कराच. मग आम्ही बघतो. मुंबईत कानडी बांधवांवर अत्याचार होत नाहीत. मुंबईत सर्व देश सामावला आहे. बिहारपासून कर्नाटकपर्यंत सर्वजण गुण्या गोविंदाने राहत आहेत.सीमा भागात तसं होतं का? सीमाभागच केंद्र शासित होईल. तिथे मराठी बांधवांव अत्याचार होत आहेत, असंही त्यांनी ठणकावले.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड