AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सामाजिक, आर्थिक प्रगती केव्हा होईल?, सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं

नित्य नूतन राहावं लागतं. मात्र संस्कृती सोडून चालत नाही.

सामाजिक, आर्थिक प्रगती केव्हा होईल?, सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं
सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलंImage Credit source: social media
| Updated on: Oct 05, 2022 | 2:21 PM
Share

सुनील ढगे, Tv 9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : सरकारच्या नीतीप्रमाणे आपली संस्कृती विदेशात रुजत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की, सामाजिक समता असली पाहिजे विषमता गेली पाहिजे. मात्र विषमता ही आपल्या मनात असते. ती विषमता मनातून गेली पाहिजे. आपले मित्र सगळेच असले पाहिजे. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपल्यातील प्रत्येकाला काम करावं लागेल. तेव्हाच आपली सामाजिक आणि आर्थिक प्रगती होईल, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. ते संघाच्या विजयादशमी सोहळ्यात बोलत होते.

  • जनसंख्याची एक समग्र नीती बनविण्याची आवश्यकता आहे. ती समाजातील सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे. सगळ्यांसाठी एकच नीती असायला पाहिजे. चीनमध्ये जनसंख्या मोठी होती त्यांनी म्हणून एका संततीला मान्यता दिली. मात्र नंतर समाजात वृद्धांची संख्या वाढली.
  • नव दिवस आध्यशक्तीची उपासना केल्यानंतर आपण विजयादशमीसाठी उपस्थित आहोत. शुभ काम करण्यासाठी शक्ती पाहिजे. संघाच्या कार्यक्रमात अशा देशात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना कार्यक्रमात बोलविण्याची परंपरा आहे. यावेळी गिर्यारोही संतोष यादव आहेत.
  • जगात आपल्या देशाने जी मदत केली त्यातून आपण समोर आलो. जगात आपल्या देशाचे महत्त्व वाढले. खेळाच्या क्षेत्रातसुद्धा आपले खेळाडू पुढे आहेत, हे पाहून छाती भरून येते. नवोथानबद्दल ऐकून खुशी होते.
  • आत्मनिर्भय भारत बरोबर आहे. मात्र आत्मा काय आहे याची स्पष्टता पाहिजे. परिस्थितीचा पथ कधीही सरळ नसतो. त्याप्रमाणे आपल्याला चालावं लागत. रस्ते काढत असताना त्यात लवचिकता पाहिजे. तेव्हा आपण पुढे जाऊ शकतो. किती लवचिक व्हायचं हे आपल्याला ठरवून चालावं लागतं, तेव्हाच त्यातून मार्ग मिळतो.
  • नित्य नूतन राहावं लागतं. मात्र संस्कृती सोडून चालत नाही. परिवर्तन जगाचा नियम आहे. त्याप्रमाणे चालावं लागते. मात्र त्यावर भटकून चालत नाही. सनातन मूल्य सम्पुष्ठात येऊ नये, यासाठी बाहेरून धोका आहे. तो आपण समजला पाहिजे. बाहेरील शक्ती त्यात बाधा आणते.
  • आमच्यात अराजकता पसरविण्याचे काम करते. त्यापासून आपण सावध असलं पाहिजे. आपल्या जाती धर्माच्या नावावर ते आपल्याशी जवळीकता निर्माण करते. आपल्यात फूट पडता कामा नये. आपण सरकारला सहकार्य केले पाहिजे. सावधान राहीलं पाहिजे. भारताचं परम वैभव हेच आपलं लक्ष असलं पाहिजे.
  • नवीन शिक्षा नीतीमध्ये आपल्या भाषा येत आहेत. मात्र आपण आपल्या मुलांना मातृभाषेत शिक्षण देतो का ? उच्च शिक्षणात इंग्रजी भाषा आवश्यक मात्र त्याची खरच पूर्ण आवश्यकता आहे का. करियर करायला इंग्रजी भाषा आवश्यक आहे, असं बिलकुल नाही.
  • आपली मातृभाषा महत्त्वाची आहे. आपल्या घरी मातृभाषा वापरतो का? निमंत्रण पत्रिका मातृभाषेत छापतो का ? हे आपण आपल्या पासूनच सुरवात करून पाहायचं आहे.
  • मुलांना जास्त पैसे मिळविणारी डिग्री घ्या असं पालक सांगतात. मग ते शिक्षण तर पैसे कामविण्याची मशीन आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वी इंग्रजी ही भाषा महत्त्वाची होती. त्यात आपल्या महापुरुषांनी सुद्धा शिक्षण घेतलं. मात्र त्यांनी आपली भाषा संस्कृती जपत आपल्या भाषेत काम केलं.
  • वैभव प्रदर्शन बंद झालं पाहिजे. आपलं जीवन दुसऱ्याच्या जीवनाला हानी न पोहचवता जगलं पाहिजे. सरकारी नोकरी प्रत्येकाला मिळणे शक्य नाही. त्यासाठी उद्यामिता वाढली पाहिजे. सरकारने स्टार्टअप सुरू केलं. त्याचा फायदा घेतला पाहिजे. त्याप्रमाणे काम केलं तर रोजगार निर्मिती होईल.
  • li>
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.