AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कापड उद्योजकांच्या दबावाला बळू पडू नका, विजय जावंधिया यांचं पंतप्रधानांना पत्र

भारताच्या बाजारात शेतकर्‍यांना 8 ते 9 हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. मात्र, हे भाव कमी करण्यासाठी कापड उद्योजकांच्या संघटनेनं केंद्र सरकारला कापसाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी केली, असे जावंधिया म्हणाले.

कापड उद्योजकांच्या दबावाला बळू पडू नका, विजय जावंधिया यांचं पंतप्रधानांना पत्र
संग्रहित चित्र
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 5:45 PM
Share

नागपूर : कापड उद्योजकांच्या दबावाला सरकारनं बळी पडू नये, असं पत्र शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलंय. कापूस निर्यात बंदी आणि सूत निर्यातीवर निर्यातकर न लावणे हे दोन्ही निर्णय सरकारनं घेऊ नये, अशी मागणी जावंधिया यांनी या पत्रातून केली आहे.

शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रानुसार, यंदा जगभरात कापसाचं पीक कमी आलंय. यंदा अमेरिकेच्या बाजारात कापसाचे भाव एक डॉलर 20 सेंट व एक डॉलर 27 सेंट प्रती पाउंडपर्यंत वाढले. रुपयात हा भाव 70 हजार रुपये प्रती खंडी होतो. भारताच्या बाजारात शेतकर्‍यांना 8 ते 9 हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. मात्र, हे भाव कमी करण्यासाठी कापड उद्योजकांच्या संघटनेनं केंद्र सरकारला कापसाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी केली, असे जावंधिया म्हणाले.

सुताच्या निर्यातीवर कर लावावा

सुताच्या निर्यातीवर निर्यातकर लावण्यात यावे, अशी मागणीही विजय जावंधिया यांनी केली आहे. या माहितीनेच बाजारात कापसाच्या दरात 500 ते 600 रुपये प्रती क्विंटलची मंदी आली असल्याचे जावंधिया यांनी सांगितलं. कापड उद्योजकांद्वारे कापसाची आयात करून कापसाचे भाव कमी करणे शक्य नसल्याने ते कापसावर निर्यात बंदीची मागणी करीत असल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.

2011 मध्ये अमेरिकेच्या बाजारात दोन डॉलर 40 सेंट प्रती पाउंड रुईचे भाव कमी झाले होते. तेव्हा भारतात 60 हजार रुपये प्रती खंडी रुईचा भाव होता. तेव्हा केंद्रातील तत्कालीन सरकारने कापूस निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असताना आपण या निर्णयाचा विरोध केला होता, अशी आठवण जावंधिया यांनी या पत्रातून पंतप्रधानांना करून दिली आहे. पिके कमजोर असताना चांगला भाव देऊन त्याची पूर्तता सरकारने करावी, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा असते, असं जावंधिया यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रातून म्हटलंय.

कापसाच्या उत्पादनात यंदा घट

विदर्भात कापसाचं पीक घेतलं जातं. वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम ते दमदापूर पट्ट्यात यंदा रोगानं कापसाचं पीक कमी झालं. कापूस वेचणाऱ्यांनी भाव वाढवून मागितला. उत्पादन कमी असल्यानं उत्पन्न फारसे झालं नाही. त्यामुळं कापूस उत्पादकाच्या डोळ्यात यंदा पाणी आलं आहे.

विधान परिषद निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळेंना कुणाचे आव्हान?, काँग्रेसकडून अद्याप उमेदवाराची घोषणा नाही, तगडा उमेदवार देणार – ठाकरे

वाघानं घेतला महिला वनरक्षकाचा बळी, ताडोबातील कोअर झोनमधील घटना

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.