AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कापड उद्योजकांच्या दबावाला बळू पडू नका, विजय जावंधिया यांचं पंतप्रधानांना पत्र

भारताच्या बाजारात शेतकर्‍यांना 8 ते 9 हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. मात्र, हे भाव कमी करण्यासाठी कापड उद्योजकांच्या संघटनेनं केंद्र सरकारला कापसाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी केली, असे जावंधिया म्हणाले.

कापड उद्योजकांच्या दबावाला बळू पडू नका, विजय जावंधिया यांचं पंतप्रधानांना पत्र
संग्रहित चित्र
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 5:45 PM
Share

नागपूर : कापड उद्योजकांच्या दबावाला सरकारनं बळी पडू नये, असं पत्र शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलंय. कापूस निर्यात बंदी आणि सूत निर्यातीवर निर्यातकर न लावणे हे दोन्ही निर्णय सरकारनं घेऊ नये, अशी मागणी जावंधिया यांनी या पत्रातून केली आहे.

शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रानुसार, यंदा जगभरात कापसाचं पीक कमी आलंय. यंदा अमेरिकेच्या बाजारात कापसाचे भाव एक डॉलर 20 सेंट व एक डॉलर 27 सेंट प्रती पाउंडपर्यंत वाढले. रुपयात हा भाव 70 हजार रुपये प्रती खंडी होतो. भारताच्या बाजारात शेतकर्‍यांना 8 ते 9 हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. मात्र, हे भाव कमी करण्यासाठी कापड उद्योजकांच्या संघटनेनं केंद्र सरकारला कापसाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी केली, असे जावंधिया म्हणाले.

सुताच्या निर्यातीवर कर लावावा

सुताच्या निर्यातीवर निर्यातकर लावण्यात यावे, अशी मागणीही विजय जावंधिया यांनी केली आहे. या माहितीनेच बाजारात कापसाच्या दरात 500 ते 600 रुपये प्रती क्विंटलची मंदी आली असल्याचे जावंधिया यांनी सांगितलं. कापड उद्योजकांद्वारे कापसाची आयात करून कापसाचे भाव कमी करणे शक्य नसल्याने ते कापसावर निर्यात बंदीची मागणी करीत असल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.

2011 मध्ये अमेरिकेच्या बाजारात दोन डॉलर 40 सेंट प्रती पाउंड रुईचे भाव कमी झाले होते. तेव्हा भारतात 60 हजार रुपये प्रती खंडी रुईचा भाव होता. तेव्हा केंद्रातील तत्कालीन सरकारने कापूस निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असताना आपण या निर्णयाचा विरोध केला होता, अशी आठवण जावंधिया यांनी या पत्रातून पंतप्रधानांना करून दिली आहे. पिके कमजोर असताना चांगला भाव देऊन त्याची पूर्तता सरकारने करावी, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा असते, असं जावंधिया यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रातून म्हटलंय.

कापसाच्या उत्पादनात यंदा घट

विदर्भात कापसाचं पीक घेतलं जातं. वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम ते दमदापूर पट्ट्यात यंदा रोगानं कापसाचं पीक कमी झालं. कापूस वेचणाऱ्यांनी भाव वाढवून मागितला. उत्पादन कमी असल्यानं उत्पन्न फारसे झालं नाही. त्यामुळं कापूस उत्पादकाच्या डोळ्यात यंदा पाणी आलं आहे.

विधान परिषद निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळेंना कुणाचे आव्हान?, काँग्रेसकडून अद्याप उमेदवाराची घोषणा नाही, तगडा उमेदवार देणार – ठाकरे

वाघानं घेतला महिला वनरक्षकाचा बळी, ताडोबातील कोअर झोनमधील घटना

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.