AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधान परिषद निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळेंना कुणाचे आव्हान?, काँग्रेसकडून अद्याप उमेदवाराची घोषणा नाही, तगडा उमेदवार देणार – ठाकरे

काँग्रेसनं उमेदवार ठरविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काल एक बैठक घेतली. यात काही नावं हायकमांडकडे पाठविण्यात आलेत. भाजपला टक्कर देण्यासाठी कॉंग्रेसही ओबीसी उमेदवारी देणार असल्याची माहिती काँग्रेसचे आमदार आणि नागपूर शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिलीय.

विधान परिषद निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळेंना कुणाचे आव्हान?, काँग्रेसकडून अद्याप उमेदवाराची घोषणा नाही, तगडा उमेदवार देणार - ठाकरे
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 20, 2021 | 1:08 PM
Share

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपनं ओबीसी कार्ड खेळत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिलीय. या माध्यमातून भाजपनं काँग्रेसपुढं तगडं आव्हान उभं केलंय. दुसरीकडे काँग्रेसचा अद्याप उमेदवार ठरलेला नाही.

काँग्रेसनं उमेदवार ठरविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काल एक बैठक घेतली. यात काही नावं हायकमांडकडे पाठविण्यात आलेत. भाजपला टक्कर देण्यासाठी कॉंग्रेसही ओबीसी उमेदवारी देणार असल्याची माहिती काँग्रेसचे आमदार आणि नागपूर शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिलीय.

जोमाने काम करणार : बावनकुळे

गेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे नाराज असल्याचं बोलल जात होतं. पण, त्यांनी पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावली. पक्षाच्या प्रचारासाठी इमाने इतबारे काम केलं. आता पक्षानं त्यांना पुन्हा संधी दिली आहे. आता पुन्हा विधिमंडळात जोमानं काम करणार असल्याचा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केलाय.

कोराडी वीज प्रकल्पग्रस्तांसाठी संघर्ष

चंद्रशेखर बावनकुळे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. कुटुंबात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. 1990 पासून त्यांनी कोराडी वीज प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आंदोलनं करून जेलमध्येही गेले. छत्रपती सेना या संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक कामे केलीत. 1995 मध्ये नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजयुमोचे उपाध्यक्ष, जिल्हा महामंत्री अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या.

भाजपने दिली होती जि.प.ची उमेदवारी

1997 मध्ये कोराडी जिल्हा परिषद क्षेत्रातून भाजपकडून उमेदवारी मिळाली. त्यावेळी ते निवडून आले. 2002 मध्ये जिल्हा परिषदेत दुसऱ्यांना निवडून आल्यानंतर ते झेडपीत विरोधी पक्षनेते झाले. 2004 मध्ये कामठी विधानसभा क्षेत्रातून भाजपने त्यांना उमेदवारी दिली. त्यात त्यांनी विजय संपादन केला. त्यानंतर पुन्हा दोनदा ते आमदार झाले. मंत्रीपद मिळाल्यानंतर नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली.

कोराडीच्या जगदंबा संस्थानचे अध्यक्ष

2010-11 नागपूर जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष झाले. श्री क्षेत्र महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळंच कोराडी देवस्थानचा विकास झालाय. कामठी-मौदा विधानसभा क्षेत्रात त्यांनी बरीच विकासकामे खेचून आणली. पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यानं त्यांनी आता पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

‘पक्षाने विश्वास टाकला, सर्वांचे आभार, विधिमंडळात पुन्हा जोमाने काम करणार’, चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया

वाघानं घेतला महिला वनरक्षकाचा बळी, ताडोबातील कोअर झोनमधील घटना

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली