AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NMC Budget | नागपूर मनपाचे नावीन्यपूर्ण 5 उपक्रम कोणते? जाणून घ्या अर्थसंकल्पात वेगळं काय?

अर्थसंकल्प सादर करताना नावीन्यपूर्ण उपक्रमांचा विचार करण्यात आलाय. बायोमायनिंग प्रकल्प हा त्यापैकी एक. असा प्रकल्प उभारणारे नागपूर हे महाराष्ट्रातील पहिलं शहर आहे. नदीपात्र, नदी काठावर मियावायी पद्धतीने 60 हजार वृक्षांची लागवड करण्यात येईल. असेच काही नावीन्यपूर्ण उपक्रम...

NMC Budget | नागपूर मनपाचे नावीन्यपूर्ण 5 उपक्रम कोणते? जाणून घ्या अर्थसंकल्पात वेगळं काय?
नागपूर मनपाच्या अर्थसंकल्पातील नावीन्यपूर्ण उपक्रमImage Credit source: tv 9
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jun 17, 2022 | 4:15 PM
Share

नागपूर : मनपा आयुक्त राधाकृष्णन (Radhakrishnan) यांनी आरोग्य सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा (Water Supply), घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण (Education), पथदिवे यासह अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांवर अर्थसंकल्पात भर दिला आहे. याशिबवाय नावीन्यपूर्ण प्रकल्पांतर्गत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासंदर्भात 5 कोटी, बीओटी तत्वावर बाजार विकसित करण्यासंदर्भात 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अमृत योजनेंतर्गत मनपाद्वारे कंत्राटदाराची नेमणूक करून 16 जलकुंभांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यापैकी 11 जलकुंभांचे कार्यादेश निर्गमित करण्यात आले आहे. या सर्व कामांसाठी 80 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

  1. बायोमायनिंग प्रकल्प : शहरातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प उभारणारे नागपूर महाराष्ट्रातील पहिले शहर आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी झिग्मा ग्लोबल एन्व्हायरो सोल्यूशनची निवड करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी 40 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  2. हर्बल उद्यान : शहरात उद्यान विभागांतर्गत 137 व नासुप्रकडून प्राप्त 44 उद्याने आहेत. यात फुलपाखरू उद्यान, सुगंधी उद्यान, रोझ उद्यान साकारण्यात येणार आहेत. जयताळा येथे 3.25 एकर परिसरात हर्बल उद्यान विकसित करण्याचे नियोजन आहे. दिव्यांगांसाठी संवेदना उद्यान : अंध, कर्णबधिर, बहुविकलांग, ऑटिजम, मेंदू पक्षपात, मानसिक मतिमंद अशा मुलांसाठी मनपातर्फे विशेष संवेदना उद्यान साकारण्यात येत आहे.
  3. शहर परिवहन : मनपा प्रशासक आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ई-बस वाहतुकीवर पूर्ण भर दिलेला आहे. त्याअंतर्गत मनपाच्या आपली बस सेवेमध्ये 115 इलेक्ट्रिक बसचा समावेश करण्यात येणार आहे.
  4. मियावाकी उद्यान : 2022-23 या आर्थिक वर्षात भांडेवाडीच्या धर्तीवर मनपाच्या उद्यानाकरिता राखीव जागा, नदीपात्र, नदी काठावर मियावायी पद्धतीने 60 हजार वृक्षांची लागवड करण्यात येईल. त्यांचे पालकत्व सामाजिक संस्थांना देण्यात येईल. पोलीस जिमखाना ते मुख्यमंत्री निवासस्थान रामगिरी रोडपर्यंत असलेल्या वॉकर्स रोड प्रमाणे इतर रोडवरही वॉकर्स स्ट्रीट निर्माण करण्याचे प्रयोजन आहे.
  5. विशेष ग्रंथालय : मनपाद्वारे वेगवेगळ्या संकल्पनेवर चार ग्रंथालये साकारण्याचे प्रस्तावित आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रमाता कस्तुरबा ग्रंथालय, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी डॉ. राममनोहर लोहिया ग्रंथालय, ऐतिहासिक साहित्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संदेश ग्रंथालय, अभ्यासिका म्हणून बाजीराव साखरे ई-ग्रंथालयाचा विकास करण्याची तरतूद आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली