AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेहुण्याची मालमत्ता जप्त झाल्याने ‘मातोश्री’च्या दारे-खिडक्या हलू लागल्या, राऊतांना सावजीचा रस्सा झोंबला; Anil Bonde यांचा घणाघात

शिवसेना संपर्क अभियानासाठी खासदार संजय राऊत तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. राऊत हे नागपुरात अस्वस्थ वाटले. चेहराही पडलेला दिसला. याचं कारण सावजी रस्स्याची कमाल तर नाही, राऊतांना सावजीचा रस्सा झोंबला, असा खरपूस समाचार माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे ( Anil Bonde) यांनी घेतला. मेहुण्याची मालमत्ता जप्त झाल्याने 'मातोश्री'च्या दारे-खिडक्या हलू लागल्या, असंही बोंडे म्हणाले.

मेहुण्याची मालमत्ता जप्त झाल्याने 'मातोश्री'च्या दारे-खिडक्या हलू लागल्या, राऊतांना सावजीचा रस्सा झोंबला; Anil Bonde यांचा घणाघात
संजय राऊत आणि अनिल बोंडेImage Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Mar 23, 2022 | 2:11 PM
Share

नागपूर : नागपुरात संजय राऊत अस्वस्थ वाटले, आणि चेहराही पडला दिसला. कदाचित सावजीच्या रस्स्याची कमाल वाटते. सावजी ही नागपूरच्या खाद्यपदार्थाची विशेषता आहे. सावजीचा रस्सा (Savji’s gravy) चांगलाच झोंबतो. सावजीचा रस्सा खाल्ल्यावर झोंबतो आणि सकाळी उठल्यावर हात धुवायच्या वेळेस विशेष करून झोंबतो, याची आठवण माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे ( Anil Bonde) यांनी करून दिली. बोंडे म्हणाले, ईडीने मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याची संपत्ती अटॅच केल्याने मातोश्रीचे दरवाजे खिडक्या हालायला लागल्या. मातोश्री पर्यंत ईडी पोहोचली. म्हणून मुख्यमंत्री अस्वस्थ वाटले. आज शिवसेनेच्या आमदारांना जेवायला बोलावलं. मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर ईडीची कारवाई याचा शिवसंपर्क (Shivsampark) अभियानाशी काहीही संबंध नाही, असंही बोंडे यांनी स्पष्ट केलं.

कोण कधी आत जाईल

शिवसेना संपर्क अभियानासाठी खासदार संजय राऊत तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. राऊत हे नागपुरात अस्वस्थ वाटले. चेहराही पडलेला दिसला. याचं कारण सावजी रस्स्याची कमाल तर नाही, राऊतांना सावजीचा रस्सा झोंबला, असा खरपूस समाचार माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी घेतला. मेहुण्याची मालमत्ता जप्त झाल्याने ‘मातोश्री’च्या दारे-खिडक्या हलू लागल्या, असंही बोंडे म्हणाले. अनिल बोंडे म्हणाले, संपर्क अभियान करा की घरात बसून राहा. मुख्यमंत्री संपर्क कराला निघालेच नाही. यांना सातत्याने भीती वाटते की कधी कोण आत जाईल.

पापाचे भूत शांत झोपू देत नाही

राज्य सरकार केव्हा पडेल से सांगू शकत नाही. पण लोकांना आता हे सरकार नको आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना केलेल्या पापाचे भुतं शांतपणे झोपू देत नाही, असा घणाघातही बोंडे यांनी केला. संजय राऊत यांच्याकडे ईओडब्लू आहे. त्यांनी आरोप केले त्यावर काहीही कारवाई झाली नाही. हे सरकार ताबोडतोब पडावं, असं लोकांना वाटतं. सरकार पडलं तर लोकं सुटकेचा श्वास घेतील.

Amravati | पलंग-गादी पाठवतो आराम करा नि राजीनामा द्या, भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांची नवाब मलिकांवर टीका

Chandrapur | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा, बँकेच्या सीबीआय चौकशीची मागणी, पालकमंत्री वडेट्टीवार-खासदार धानोरकर समोरासमोर

ठाकरे सरकारमध्ये मतभेद आहेत काय?, Sanjay Raut यांनी पहिल्यांदाच दिली कबुली; नेमकं काय म्हणाले?

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद.....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद......