AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विशेष पॅकेजमधून जिल्ह्याचं नाव वगळलं, सत्तधारी पक्षातील आमदार आक्रमक, थेट सरकारला इशारा

राज्य सरकारने घोषित केलेल्या विशेष पॅकेजमधून नांदेड जिल्हा वगळण्यात आला आहे. यावर शिवसेनेचे नांदेड दक्षिण मतदार संघाचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांनी प्रतिक्रिया दिली असून, चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

विशेष पॅकेजमधून जिल्ह्याचं नाव वगळलं, सत्तधारी पक्षातील आमदार आक्रमक, थेट सरकारला इशारा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2025 | 7:08 PM
Share

राज्य सरकारने घोषित केलेल्या विशेष पॅकेजमधून नांदेड जिल्हा वगळण्यात आला आहे. यावर शिवसेनेचे नांदेड दक्षिण मतदार संघाचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांनी प्रतिक्रिया दिली असून, चांगलाच संताप व्यक्त केला आहे.  मी सत्ताधारी आमदार असलो तरी शेतकऱ्याचा आहे. शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी टोकाची भूमिका घ्यायला तयार आहे. असा थेट इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी ही चूक केली, त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

नेमकं काय म्हटलं बोंढारकर यांनी?   

शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, अनेक शेतकऱ्यांचे फोन आले. शेतकऱ्यांची जी भावना आहे ती अगदी बरोबर आहे, नांदेड जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.  शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.  नांदेडचे नाव जीआरमध्ये आलं नाही, ही नांदेड जिल्ह्यासाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. जीआरमध्ये काही चूक झाली असेल, जर अधिकाऱ्यांनी काही चूक केली असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी, यामुळे जिल्ह्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे, असं बोंढारकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांचा रोष वाढत आहे, शेतकऱ्याच्या रोषाला आम्हाला समोर जावं लागत आहे. मी सरकारमधला आमदार असतो तरी आधी मी शेतकरी आहे. शेतकऱ्यांसाठी कुठल्याही टोकाच्या भूमिकेत जायची माझी तयारी आहे.  शेतकरी जीआरची होळी करत आहे, कारण शेतकऱ्याचं पोट जळालं आहे. जीआरमध्ये नांदेड जिल्ह्याचा  समावेश व्हावा अशी आमची मागणी आहे, असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

राज्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे, अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर केलं आहे, मात्र विशेष पॅकेजमधून नांदेड वगळण्यात आल्यानं आमदार आनंद पाटील बोंढारकर यांनी संताप व्यक्त केला आहे, त्यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक