AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाविकास आघाडी सरकारला 5 नव्हे तर 25 वर्षे भीती नाही’, छगन भुजबळांचा दावा, भाजपवर टीकास्त्र

महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याची टीका भाजप नेते सातत्यानं करत असतात. पण महाविकास आघाडी एकसंध राहील असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

'महाविकास आघाडी सरकारला 5 नव्हे तर 25 वर्षे भीती नाही', छगन भुजबळांचा दावा, भाजपवर टीकास्त्र
| Updated on: Dec 06, 2020 | 2:48 PM
Share

नाशिक: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यावरुन अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपचे नंबर एकचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सोडली. जयसिंगराव गायकवाड यांनीही भाजपला रामराम ठोकला. पदवीधरमध्ये पुणे, नागपूरमध्येही महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आहे. त्यामुळे आता राजकारणाची हवा बदलली आहे, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिलीय. (Chagan Bhujbal on mahavikas aghadi government)

महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याची टीका भाजप नेते सातत्यानं करत असतात. पण महाविकास आघाडी एकसंध राहील असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. आता भीती महाविकास आघाडी नाही तर भाजपच्या लोकांना आहे. भाजपमधील लोकप्रतिनिधींनी खडसे आणि जयसिंगरावांच्या पावलावर पाऊल टाकायचं ठरवलं तर अवघड होईल, असा टोलाही भुजबळांनी लगावला आहे. शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकारला आता 5 नाही तर 25 वर्षे भीती नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

ओबीसींमध्ये दोन गट नाहीत- भुजबळ

ओबीसी समाजात दोन गट पडल्याची चर्चा सुरु आहे. त्यावर ओबीसी समाजात दोन गट नाहीत, असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील मोर्चात काही लोकांनी शरद पवार यांच्या फोटोवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर ऑब्जेक्शन घेण्याचं कारण काय? महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्याचा निर्णय शरद पवार यांनीच घेतला आहे. ओबीसींची वेगळी जनगणना व्हावी, यातही त्याचाच पुढाकार आहे. पवार हे सत्यशोधक समाजाच्या कुटुंबातून मोठे झाले आहेत. त्यामुळे सर्वांना मदत करण्याचीच त्यांची भूमिका असल्याचंही भुजबळ म्हणाले.

‘शेतकरी आंदोलनावर केंद्रानं भूमिका घ्यावी’

गेल्या 10 दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकारनं भूमिका घ्यायला हवी. शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारनं सकारात्मकतेनं घेणं गरजेचं असल्याचं मत भुजबळांनी व्यक्त केलं आहे. शेतकरी आपल्या राज्यात परत गेले तर मोठी जखम देऊन जातील, असा इशाराही भुजबळांनी दिला आहे.

शेतकरी आंदोलन प्रश्नावर पवार राष्ट्रपतींना भेटणार

माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय. यावेळी पवार यांच्यासोबत अन्य राजकीय पक्षांचे काही नेते उपस्थित असणार आहेत. शरद पवार हे सीताराम येचुरी आणि डी. राजा यांच्यासह राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेणार आहेत. या भेटीत शेतकरी आंदोलनाविषयी चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:

BREAKING | शरद पवारांनी शड्डू ठोकला, थेट राष्ट्रपतींना भेटणार

भाजपने पराभवातून धडा घ्यावा; ईडी, सीबीआयच्या दमदाटीचे राजकारण आता चालणार नाही: भुजबळ

Chagan Bhujbal on mahavikas aghadi government

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....