AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Highway Agitation | स्वातंत्र्य दिनापूर्वी करा महामार्गाची दुरुस्ती, अन्यथा राष्ट्रवादी करणार अनोखं आंदोलन, आंदोलनाची नाशिकमध्ये चर्चा

Highway Agitation | मुंबई ते नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनोखं आंदोलन करणार आहे.

Highway Agitation | स्वातंत्र्य दिनापूर्वी करा महामार्गाची दुरुस्ती, अन्यथा राष्ट्रवादी करणार अनोखं आंदोलन, आंदोलनाची नाशिकमध्ये चर्चा
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलनImage Credit source: सोशल मीडिया
| Edited By: | Updated on: Jul 28, 2022 | 3:10 PM
Share

Highway Agitation | पावसाने (rain)दमदार हजेरी लावल्याने राष्ट्रीय महामार्गाला (National Highway) खड्यांचे ग्रहण लागले आहे. खड्यातून प्रवास करताना वाहनधारकांची चांगलीच तारंबळ उडत आहे. घनघोर पावसामुळे आणि खड्यांमुळे अनेकदा वाहतूक मंदावते आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. पावसाळीपूर्व काम न केल्याने मुंबई नाशिक महामार्गाचे पितळ लगेच उघडे पडले. वाहनधारकांना जीव मुठ्ठीत घेऊन या मार्गावरुन प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांची ही कसरत पाहता राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलनाद्वारे या खड्यांकडे लक्ष्य वेधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबई ते नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे स्वातंत्र्य दिनापर्यंत बुजवावेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने (Nationalist Youth congress) केली आहे. अन्यथा वाहनांवरील फास्ट टॅगला (FASTag) काळे स्टिकर लावले जातील, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला आहे.आता या आंदोलनापूर्वीच (Agitation)अधिकारी रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहनधारकांना आणि नागरिकांना खड्डे मुक्तीचा सुखद धक्का देतात की राष्ट्रवादीला अजून आक्रमक भूमिका घ्यावी लागते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नितीन गडकरी यांना पत्र

खडे लवकरात लवकर बुजवण्यासाठीचे पत्र शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पाठविले आहे. महामार्गावरील खड्यांमुळे अनेक ठिकाणी वाहने अडकून पडतात. परिणामी वाहतूक कोंडी होते. त्याचा फटका वाहनधारकांसह जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना बसत आहे. 15 ऑगस्ट 2022 रोजी पर्यंत स्वातंत्र्य दिनापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवून दर्जेदार रस्ता करावा, अन्यथा वाहनांवरील फास्ट टॅगवर काळे स्टिकर लावण्यात येईल असा इशारा केंद्रीय मंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

12 तास वाहतुकीचा खोळंबा

खैरे यांच्या पत्रात या महामार्गावरील त्रासाचा पाढाचा वाचण्यात आला आहे.मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खड्डे झाले आहेत. त्यामुळे अपघात वाढलेत. मुसळधार पावसात घोटी, इगतपुरी आणि कसारा घाटात अनेक अपघात केवळ खड्डय़ांमुळे घडले आहेत. दुसरीकडे कसारा घाटात अपघात झाल्यास दोन दिवस वाहतुकीचा खोळंबा होता. 12-12 तास वाहतूक खोळंबते. वाहनांच्या लांबच लांब रांग लागतात. मुंबई-नाशिक महामार्गावर एकूण तीन टोल नाके आहेत. टोल वसुली होत असतानाही नागरिकांना आणि वाहनधारकांना खड्यांतून मार्ग काढावा लागत असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. दरवर्षी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाला आंदोलनाचा इशारा दिल्यावर रस्त्यांची दुरुस्ती केली जाते. परंतु कामाचा दर्जा खालावलेला असल्याने. तात्पुरती मलमट्टी केली जात असल्याने दुसऱ्यावर्षी पावसाळ्यात पुन्हा हा महामार्ग खड्यांत जात असल्याचे पत्रात म्हटले आहे. या महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची विनंती खैरे यांनी केली असून 15 ऑगस्ट 2022 रोजी पर्यंत स्वातंत्र्य दिनापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे तातडीने न बुजवल्यास फास्ट टॅगवर काळे स्टीकर लावण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.