AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Highway Agitation | स्वातंत्र्य दिनापूर्वी करा महामार्गाची दुरुस्ती, अन्यथा राष्ट्रवादी करणार अनोखं आंदोलन, आंदोलनाची नाशिकमध्ये चर्चा

Highway Agitation | मुंबई ते नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनोखं आंदोलन करणार आहे.

Highway Agitation | स्वातंत्र्य दिनापूर्वी करा महामार्गाची दुरुस्ती, अन्यथा राष्ट्रवादी करणार अनोखं आंदोलन, आंदोलनाची नाशिकमध्ये चर्चा
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलनImage Credit source: सोशल मीडिया
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jul 28, 2022 | 3:10 PM
Share

Highway Agitation | पावसाने (rain)दमदार हजेरी लावल्याने राष्ट्रीय महामार्गाला (National Highway) खड्यांचे ग्रहण लागले आहे. खड्यातून प्रवास करताना वाहनधारकांची चांगलीच तारंबळ उडत आहे. घनघोर पावसामुळे आणि खड्यांमुळे अनेकदा वाहतूक मंदावते आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. पावसाळीपूर्व काम न केल्याने मुंबई नाशिक महामार्गाचे पितळ लगेच उघडे पडले. वाहनधारकांना जीव मुठ्ठीत घेऊन या मार्गावरुन प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांची ही कसरत पाहता राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलनाद्वारे या खड्यांकडे लक्ष्य वेधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबई ते नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे स्वातंत्र्य दिनापर्यंत बुजवावेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने (Nationalist Youth congress) केली आहे. अन्यथा वाहनांवरील फास्ट टॅगला (FASTag) काळे स्टिकर लावले जातील, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला आहे.आता या आंदोलनापूर्वीच (Agitation)अधिकारी रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहनधारकांना आणि नागरिकांना खड्डे मुक्तीचा सुखद धक्का देतात की राष्ट्रवादीला अजून आक्रमक भूमिका घ्यावी लागते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नितीन गडकरी यांना पत्र

खडे लवकरात लवकर बुजवण्यासाठीचे पत्र शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पाठविले आहे. महामार्गावरील खड्यांमुळे अनेक ठिकाणी वाहने अडकून पडतात. परिणामी वाहतूक कोंडी होते. त्याचा फटका वाहनधारकांसह जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना बसत आहे. 15 ऑगस्ट 2022 रोजी पर्यंत स्वातंत्र्य दिनापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवून दर्जेदार रस्ता करावा, अन्यथा वाहनांवरील फास्ट टॅगवर काळे स्टिकर लावण्यात येईल असा इशारा केंद्रीय मंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

12 तास वाहतुकीचा खोळंबा

खैरे यांच्या पत्रात या महामार्गावरील त्रासाचा पाढाचा वाचण्यात आला आहे.मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खड्डे झाले आहेत. त्यामुळे अपघात वाढलेत. मुसळधार पावसात घोटी, इगतपुरी आणि कसारा घाटात अनेक अपघात केवळ खड्डय़ांमुळे घडले आहेत. दुसरीकडे कसारा घाटात अपघात झाल्यास दोन दिवस वाहतुकीचा खोळंबा होता. 12-12 तास वाहतूक खोळंबते. वाहनांच्या लांबच लांब रांग लागतात. मुंबई-नाशिक महामार्गावर एकूण तीन टोल नाके आहेत. टोल वसुली होत असतानाही नागरिकांना आणि वाहनधारकांना खड्यांतून मार्ग काढावा लागत असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. दरवर्षी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाला आंदोलनाचा इशारा दिल्यावर रस्त्यांची दुरुस्ती केली जाते. परंतु कामाचा दर्जा खालावलेला असल्याने. तात्पुरती मलमट्टी केली जात असल्याने दुसऱ्यावर्षी पावसाळ्यात पुन्हा हा महामार्ग खड्यांत जात असल्याचे पत्रात म्हटले आहे. या महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची विनंती खैरे यांनी केली असून 15 ऑगस्ट 2022 रोजी पर्यंत स्वातंत्र्य दिनापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे तातडीने न बुजवल्यास फास्ट टॅगवर काळे स्टीकर लावण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Follow Us
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके