AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Loadshedding : ऊर्जा राज्यमंत्री तनपुरेंनाच लोडशेडिंगचा फटका; कार्यक्रमात बत्ती गुल, संकटासाठी केंद्राला लावला बोल!

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) तावाताने बोलत होते. राज्यातल्या भारनियमनाच्या (Loadshedding) संकटाला तत्कालीन फडणवीस सरकार आणि सध्याच्या केंद्र सरकारला जबाबदार धरत होते. केंद्राने कोळसा पुरवठा केला, तर असाच प्रश्नच उदभवला नसता, अशी टीकेची तोफडही डागत होते. मात्र, अचानक याचवेळी कार्यक्रमातली बत्ती गुल झाली.

Loadshedding : ऊर्जा राज्यमंत्री तनपुरेंनाच लोडशेडिंगचा फटका; कार्यक्रमात बत्ती गुल, संकटासाठी केंद्राला लावला बोल!
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मनमाड येथील कार्यक्रमात बत्तीगुल झाली.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Apr 22, 2022 | 12:14 PM
Share

नाशिकः ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) तावाताने बोलत होते. राज्यातल्या भारनियमनाच्या (Loadshedding) संकटाला तत्कालीन फडणवीस सरकार आणि सध्याच्या केंद्र सरकारला जबाबदार धरत होते. केंद्राने कोळसा पुरवठा केला, तर असाच प्रश्नच उदभवला नसता, अशी टीकेची तोफडही डागत होते. मात्र, अचानक याचवेळी कार्यक्रमातली बत्ती गुल झाली. त्यामुळे अधिकाऱ्यांची हवा मात्र टाइट झाली. हा सारा प्रकार नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या मनमाडमध्ये घडला. येथे एका क्लिनीकच्या उदघाटनासाठी तनपुरे यांनी हजेरी लावली आणि हा प्रकार घडला. दरम्यान, तनपुरे येवला दौऱ्यावरही होते. येथे त्यांनी शासकीय विश्रामगृहावर विश्रांती घेतली. यावेळी पत्रकारांशीही त्यांनी संवाद साधला. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रवर आलेल्या ऊर्जा संकटाला हे महाविकास आघाडीला जबाबदार धरले आहे. याप्रकरणी राज्य सरकारच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी केलीय. यावर प्रश्न विचारला असता तनपुरे म्हणाले की, आंबेडकर साहेबांचा मी आदर करतो, पण त्यानी जरा संपूर्ण माहिती घेऊन यावर खरे बोलणे अपेक्षित आहे.

देशभर कोळशाचा तुटवडा

तनपुरे म्हणाले की, हे फक्त महाराष्ट्रावरती आलेले संकट नाही. सध्या देशभरात सगळीकडे कोळशाचा तुटवडा आहे. याचा पुरवठा केंद्राकडून होतो. त्यामुळे सध्या महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा अगदी उत्तर प्रदेश सगळीकडे लोडशेडिंग मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. फक्त महाराष्ट्र शासनाला दोष देण्यापेक्षा केंद्र शासनाने कोळशाचे नियोजन केले, तर फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये हे संकट टळेल. त्यामुळे आंबेडकर साहेबांचा मी आदर करतो पण त्यांनी संपूर्ण माहिती खोलात घेऊन जर बोलले असते तर अधिक बरे झाले असते.

केंद्र कसे जबाबदार?

तनपुरे म्हणाले की, केंद्र कसे जबाबदार आहे, याची खरी आकडेवारी देखील देऊ शकतो. आज जेवढा कोळसा आपले महानिर्मितीच्या प्लँटला लागतो. त्याच्या पेक्षा कमी कोळसा आहे. पावसाळ्यामध्ये कोळशाचा स्टॉक जास्त प्रमाणात जास्त करावा लागतो. दोन दोन महिने पुरेल एवढाच कोळसा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साठवावे लागतो, पण तसे होताना दिसत नाहीये. त्यामुळे कदाचित हे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा नंतर आणखी गडद देखील होऊ शकतो. या संकटासाठी फक्त केंद्र सरकार पूर्णपणे जबाबदार आहे. त्यांनी महाराष्ट्र शासनावर करण्यापेक्षा आधी कोळशाचा योग्य पुरवठा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Follow Us
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...  प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
CET Exam Scam | बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट चर्चेत
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा... काय घडलं?
शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट...
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....