AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक-मुंबई दोन तासांत; गडकरी म्हणतात टेप करून ठेवा, एकही आश्वासन खोटं होणार नाही, पाडला घोषणांचा पाऊस

येणाऱ्या काळात तुम्ही नाशिक ते मुंबई अवघ्या दोन तासांत पोहचाल. माझं बोलणं टेप करून ठेवा. एकही आश्वासन खोटं होणार नाही, असं आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिककरांना देत घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडला.

नाशिक-मुंबई दोन तासांत; गडकरी म्हणतात टेप करून ठेवा, एकही आश्वासन खोटं होणार नाही, पाडला घोषणांचा पाऊस
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
| Edited By: | Updated on: Oct 05, 2021 | 11:02 AM
Share

नाशिकः येणाऱ्या काळात तुम्ही नाशिक ते मुंबई अवघ्या दोन तासांत पोहचाल. माझं बोलणं टेप करून ठेवा. एकही आश्वासन खोटं होणार नाही, असं आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिककरांना देत घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडला.

गडकरींच्या हस्ते राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलासह तब्बल 2048 कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. नाशिकमधल्या मनोहर गार्डन येथे हा भव्यदिव्य सोहळा पार पडला. यावेळी गडकरींनी आपल्या भाषणातून चौफेर फटकेबाजी केली. नाशिककरांना प्रगतीचे नवे स्वप्न दाखवले. त्यांनी नाशिकचा उड्डाणपूल करणाऱ्या कंत्राटदाराचे कौतुक केले. सोबतचद्वारका ते नाशिकरोड या 1600 कोटी खर्चाच्या डबल डेकर उड्डाणपुलाला मंजुरी दिली. मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश देत 1 महिन्याच्या आत ही दुरुस्ती होईल, असे आश्वासन दिले. त्यांनी नाशिक-मुंबई महामार्गाच्या सहा पदरीकरणासह सिमेंट रस्त्यासाठीच्या कामाला पाच हजार कोटी रुपयांची मंजुरी दिल्याची घोषणा केली. त्यामुळे येणाऱ्या काळात नाशिक-मुंबई अंतर फक्त दोन तासांत कापले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. वरळी-बांद्रा पुढे मला वसईपर्यंत जोडायचं होतं, ते मला त्यावेळी शक्य झालं नाही. मात्र, नरिमन पॉईंट ते दिल्ली हे अंतर 12 तासांत गाठता आलं पाहिजे, हे काम करायचं असल्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. नाशिक शहराच्या बाजूला लॉजिस्टिकसाठी जागा असेल तर द्या, मी हा विभाग डेव्हलप करतो. महापालिकेने जागा दिल्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वतीने लॉजिस्टिक पार्क उभारू, असे गडकरी म्हणाले.

नाशिक पालिकेने स्मार्ट सिटी उभारावी

गडकरी म्हणाले, सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गावर नाशिक महापालिकेने स्मार्ट सिटी उभारावी. नाशिकचा विकास करताना इकॉनॉमिक्स बरोबर इकॉलॉजी सांभाळावी. समुद्राला वाहून जाणारं पाणी अडवणे महत्वाचं आहे. मात्र, महाराष्ट्र आणि गुजरातचं एकमत होत नसल्यानं तुला ना मला पाणी चाललं समुद्राला, अशी परिस्थिती झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

खासदारांना केले आवाहन

गडकरी म्हणाले, देशात दरवर्षी 5 लाख अपघात होतात. त्यात दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. अपघातात लाखो लोकांचे हात-पाय जातात. इतर काही राज्यात अपघातांचं प्रमाण कमी आहे. मात्र, महाराष्ट्रात त्या तुलनेत अपघात कमी झाले नाहीत. त्यामुळे झिरो अपघात उपक्रमासाठी खासदारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

नाशिकचे वातावरण जपा

गडकरी म्हणाले, शहराचा विकास होत असताना नाशिकचं सुंदर वातावरण खराब होणार नाही, याची जळजी घ्या. शहरातले ट्रॅक टर्मिनल, कोल्ड स्टोरेज, गोडाऊन, ट्रकचे गॅरेज सर्व काही शहराबाहेर महामार्गावर स्थलांतरित करा. त्यामुळे वाहतुकीची समस्याही सुटेल आणि प्रदूषणही कमी होईल. नाशिकचे शेतकरी खूप मेहनती आहेत. विदर्भातील लोकांनी त्यांच्याकडून काही तरी शिकावे, असे आवाहन त्यांनी केले.

इतर बातम्याः

Special Report: गडकरींचा देशीवाद, गाईचे शेण अन् आकाशवाणीची धून!

गोदावरीत उतराल तर जीवास मुकाल; रामकुंड परिसरात 4 दिवसांत 4 बुडाले

दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान.
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया.
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?.
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!.