AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“विरोधी पक्षांचे तोंड बंद करण्यासाठी केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर”;राष्ट्रवादीच्या नेत्यानं भाजपवर तोफ डागली

भाजपची सत्ता आल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणा या भाजपच्या इशाऱ्यावर चालत आहेत. आणि त्याचा त्रास विरोधी पक्षातील नेत्यांना दिला जातो अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

विरोधी पक्षांचे तोंड बंद करण्यासाठी केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर;राष्ट्रवादीच्या नेत्यानं भाजपवर तोफ डागली
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Mar 05, 2023 | 4:12 PM
Share

लासलगाव/नाशिक : भाजप सरकार सत्तेत आल्यापासून सरकार विरोधात बोलणाऱ्यांविरोधात ईडी, सीबीआयसारख्या संस्था लावून त्यांना अटक करण्याचे काम भाजपकडून सातत्याने करण्यात आले. भजापच्या नेत्यांकडून विरोधकांवर हा सातत्याने प्रयोग करण्यात आला. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्यातील भाजपच्या नेत्यांवर टीका करताना विरोधी पक्षाचे तोंड बंद करण्यासाठी भाजपचे केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

ते आज येवला दौऱ्यावर आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.यावेळी छगन भुजबळ यांनी भाजपवर निशाणा साधला.

विरोधकांवर स्वार्थी वृत्तीने कशा प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणामार्फत कारवाई केली जाते याचे त्यांनी आपल्यासह कोण कोणत्या नेत्यांवर कारवाई केली जाते असं सांगत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

त्यामुळे आता विरोधी नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त पत्र लिहिले आहे की भाजपचे केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. ईडी आणि सीबीआयसारख्या संस्थांच्या गैरवापर करत आहे.

याबाबत भुजबळ यांना विचारले असता भुजबळ यांनी सांगितले की, पहिला प्रयोग हा माझ्यावरच करण्यात आला आहे. राजकीय दृष्टीतून जिथे जिथे भाजपच्या विरोधात बोललं जातं.

जिथं जिथं त्यांच्या विरोधातील सरकार आहे तेथील प्रमुख नेत्यांवर अशा यंत्रणेद्वारे बडगा उचलला जातो आहे. एवढ्या पाच सहा वर्षांमध्ये अनेक लोक ईडीने पकडले मात्र याच्या मागील विचार केला तर 68 ते 70 वर्षात एक ते चार माणसंच या प्रकरणी पकडली गेली आहेत.

आता तर रोज कोणाला अन कोणाला ते पकडले जात आहे. महाराष्ट्रसह इतर राज्यातदेखील याच गोष्टी चालू असून विरोधी पक्षाचे तोंड दाबण्यासाठी अशा यंत्रणाचा गैरवापर केला जातो आहे असं भुजबळ यांनी सांगितले आहे.

छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर टीका करताना त्यांनी ईडी, सीबीआय आणि इतर प्रकारच्या तपास यंत्रणांचा वापर करत कशा पद्धतीने नेत्यांना त्रास दिला जातो आहे.

भाजपची सत्ता आल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणा या भाजपच्या इशाऱ्यावर चालत आहेत. आणि त्याचा त्रास विरोधी पक्षातील नेत्यांना दिला जातो अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!