AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“विरोधी पक्षांचे तोंड बंद करण्यासाठी केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर”;राष्ट्रवादीच्या नेत्यानं भाजपवर तोफ डागली

भाजपची सत्ता आल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणा या भाजपच्या इशाऱ्यावर चालत आहेत. आणि त्याचा त्रास विरोधी पक्षातील नेत्यांना दिला जातो अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

विरोधी पक्षांचे तोंड बंद करण्यासाठी केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर;राष्ट्रवादीच्या नेत्यानं भाजपवर तोफ डागली
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Mar 05, 2023 | 4:12 PM
Share

लासलगाव/नाशिक : भाजप सरकार सत्तेत आल्यापासून सरकार विरोधात बोलणाऱ्यांविरोधात ईडी, सीबीआयसारख्या संस्था लावून त्यांना अटक करण्याचे काम भाजपकडून सातत्याने करण्यात आले. भजापच्या नेत्यांकडून विरोधकांवर हा सातत्याने प्रयोग करण्यात आला. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्यातील भाजपच्या नेत्यांवर टीका करताना विरोधी पक्षाचे तोंड बंद करण्यासाठी भाजपचे केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

ते आज येवला दौऱ्यावर आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.यावेळी छगन भुजबळ यांनी भाजपवर निशाणा साधला.

विरोधकांवर स्वार्थी वृत्तीने कशा प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणामार्फत कारवाई केली जाते याचे त्यांनी आपल्यासह कोण कोणत्या नेत्यांवर कारवाई केली जाते असं सांगत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

त्यामुळे आता विरोधी नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त पत्र लिहिले आहे की भाजपचे केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. ईडी आणि सीबीआयसारख्या संस्थांच्या गैरवापर करत आहे.

याबाबत भुजबळ यांना विचारले असता भुजबळ यांनी सांगितले की, पहिला प्रयोग हा माझ्यावरच करण्यात आला आहे. राजकीय दृष्टीतून जिथे जिथे भाजपच्या विरोधात बोललं जातं.

जिथं जिथं त्यांच्या विरोधातील सरकार आहे तेथील प्रमुख नेत्यांवर अशा यंत्रणेद्वारे बडगा उचलला जातो आहे. एवढ्या पाच सहा वर्षांमध्ये अनेक लोक ईडीने पकडले मात्र याच्या मागील विचार केला तर 68 ते 70 वर्षात एक ते चार माणसंच या प्रकरणी पकडली गेली आहेत.

आता तर रोज कोणाला अन कोणाला ते पकडले जात आहे. महाराष्ट्रसह इतर राज्यातदेखील याच गोष्टी चालू असून विरोधी पक्षाचे तोंड दाबण्यासाठी अशा यंत्रणाचा गैरवापर केला जातो आहे असं भुजबळ यांनी सांगितले आहे.

छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर टीका करताना त्यांनी ईडी, सीबीआय आणि इतर प्रकारच्या तपास यंत्रणांचा वापर करत कशा पद्धतीने नेत्यांना त्रास दिला जातो आहे.

भाजपची सत्ता आल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणा या भाजपच्या इशाऱ्यावर चालत आहेत. आणि त्याचा त्रास विरोधी पक्षातील नेत्यांना दिला जातो अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Follow Us
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळेंची खासदारांसह पंतप्रधानांच्या भेट
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळे खासदारांसह पंतप्रधानांच्या भेटीसाठी दाखल; व्हिडीओ आला समोर
बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही...
Chandrashekhar Bawankule | कुणबी प्रमाणपत्रावरून मोठा ट्विस्ट! बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही; अधिकाऱ्याचं पत्र आलं समोर
अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
Manoj Jarange VS Chandrashekhar Bawankule | अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम; बावनकुळेंवरही जोरदार हल्लाबोल
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं थेट विधान
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं सूचक विधान, म्हणाले...
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायमूर्तींची अचानक बदली, नेमकं काय घडलं?
आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा! आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक
MNS Meeting | राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक; मनसेत मोठे फेरबदल होणार?
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाले, शुद्ध....
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाला, शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या...
नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा
Ganesh Naik | नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा; नेमका निशाणा कुणावर?
मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा निर्णय
Mumbai Water Cut | मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! धरणसाठा 88.70% वर; पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय