AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीमुंबई ते मुंबई बोट सेवा सुरु होणार, इतक्या कमी वेळात प्रवास सुसाट होणार

नवीमुंबईतील नेरुळ जेट्टीहून बोटीने आता भाऊचा धक्का असा जलप्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. रेल्वे आणि रस्ते मार्गानंतर आता जलमार्गानेही नवीमुंबई ते मुंबई असा प्रवास करता येणार आहे.

नवीमुंबई ते मुंबई बोट सेवा सुरु होणार, इतक्या कमी वेळात प्रवास सुसाट होणार
ferry boat
| Updated on: Dec 09, 2025 | 10:58 PM
Share

नवीमुंबई ते दक्षिण मुंबईतील भाऊचा धक्का असा जलप्रवास सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीमुंबईतील सिडकोच्या नेरुळ जेट्टी ते भाऊचा धक्का असा जलप्रवास सुरु होणार आहे. त्यामुळे नवीमुंबई ते मुंबई बेटावर केवळ अर्ध्या तासात पोहचता येणार आहे. या जलप्रवासासाठी ९३५ रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे रेल्वे आणि रस्ते मार्गाच्या पेक्षा कमी वेळात मुंबईत पोहचता येणार आहे.

सिडकोच्या नेरुळ जेट्टी ते भाऊचा धक्का ही रखडलेली जलप्रवास योजना आता १५ डिसेंबर पासून सुरु होत आहे. त्यामुळे नवीमुंबईतील प्रवाशांना आता जलमार्गे देखील मुंबई गाठता येणार आहे. सिडकोने पाम बीच मार्गाजवळ नेरुळमध्ये जेट्टी बांधली होती. या जेट्टीतून आधी रो-रो सेवा सुरु करण्याचा विचार होता. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ही सेवा बारगळी आहे. आता जेट्टी तयार असूनही अनेक वर्षे येथून जलप्रवास सुरु झाला नव्हता. आता येत्या १५ डिसेंबर पासून नेरुळ ते भाऊचा धक्का असा जलप्रवास करता येणार आहे.

सध्या नेरुळ ते गेटवे जवळील घारापूरी बेटा दरम्यान जलवाहतूक सुरु आहे. सकाळी आणि सायंकाळी अशा दोन बोटीच्या फेऱ्या होत आहेत. याकरीता प्रति व्यक्ती ५६० रुपये तिकीट दर आहे. नेरुळ ते भाऊचा धक्का असा जलप्रवास सुरु करण्याची परवानगी महाराष्ट्र मेरीबोर्डाकडे प्रलंबित आहे. या मागणीवर आठवडाभरात निर्णय होऊन आता येत्या १५ डिसेंबरपासून ही सेवा प्रत्यक्षात अस्तित्वात येणार आहे.

तिकीट दर किती ?

नेरुळ ते भाऊचा धक्का अशा जलप्रवासाला ९३५ रुपये तिकीट दर आहे. नेरुळ ते भाऊचा धक्का जलसेवेसाठी २० आसनाची बोट आहे. दिवसभरात सकाळ आण संध्याकाळ अशा चार फेऱ्या होणार आहेत. अवघ्या अर्ध्या तासात नेरुळ वरुन भाऊचा धक्का येथे पोहचता येणार आहे. महाराष्ट्र मेरीबोर्डाने या संदर्भात हिरवा कंदील दाखवताच ही सेवा सुरु होणार आहे.९३५ रुपये हा तिकीट दर थोडा जास्त असून हा तिकीट दर सामान्यांना परवडणारा नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. शिवाय भाऊचा धक्का ते मुंबईतील फोर्ट भागात जाण्यासाठी बेस्टच्या बसेसची संख्या देखील अपुरी असल्याने या सेवेला कितपत प्रतिसाद मिळणार हा देखील प्रश्नच असल्याचे म्हटले जात आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला