राज ठाकरेंच्या रणरागिनी पूरग्रस्तांच्या मदतीला धावल्या, मनसेची नवी मुंबई महिला सेना संकटात एकवटली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या रणरागिनी पूरग्रस्तांच्या मदतीला धावल्या आहेत. मनसेची नवी मुंबईची महिला सेना संकटात एकवटली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना ‘कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते.
नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या रणरागिनी पूरग्रस्तांच्या मदतीला धावल्या आहेत. मनसेची नवी मुंबईची महिला सेना संकटात एकवटली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना ‘कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर मनसेच्या रणरागिणी आता पुढे सरसावल्या आहेत.
मनसे महिला सेनेच्या शहर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी कंबर कसली
महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या नवी मुंबई शहराध्यक्षआरती धुमाळ आणि उप शहर अध्यक्षा अनिता नायडू, ऐरोली मधून उपशहर सौ. शुभांगी बंदीछोडे, कोपरखैरणे मधून उपशहर अध्यक्षा सोनिया धनके आणि दिपाली ढऊल यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळवून आपापल्या परीने पुरग्रस्तांसाठी शक्य तेवढी मदत जमा केली . म्हणतात ना, “थेंबे-थेंबे तळे साचे!” ह्या उक्तीप्रमाणे सर्व महिला महाराष्ट्र सैनिकांनी संकटात सापडलेल्या मराठी माणसांसाठी मदत केली आणि बघता-बघता गरजोपयोगी वस्तूची मोठी मदत जमा झाली. राजसाहेबांच्या या रणरागिणींचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. आरती धुमाळ यांनी बेलापुर हून तर जुइनगर येथून अनिता नायडू यांनी सर्व महिला सेनेसह टेम्पो, ट्रक आणि पूर्ण बस भरून थेट मदतीला पोहोचले.
महापुरानंतरच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मोठा निर्णय, 7 अधिकारी थेट चिपळूण-महाडला वर्गhttps://t.co/bPlWyF6xx1#Flood #Chiplun #Mahad
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 1, 2021
संबंधित बातम्या :
पूरग्रस्तांसाठी नवी मुंबई महापालिकेचा सिंहाचा वाटा, 206 स्वयंसेवकांचं पथक चिपळूणकडे रवाना