AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरफोडी करणारी सराईत टोळी अशी अडकली पोलिसांच्या जाळ्यात; जप्त केलेला मुद्देमाल बघून पोलिसांनाच फुटला घाम

या टोळीने आरोपींकडून विविध गुन्ह्यात चोरलेला 30 लाख 17 हजार रुपये किंमतीचा चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. यासोबतच या टोळीतील आणखी 2 जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घरफोडी करणारी सराईत टोळी अशी अडकली पोलिसांच्या जाळ्यात; जप्त केलेला मुद्देमाल बघून पोलिसांनाच फुटला घाम
| Edited By: | Updated on: Apr 06, 2023 | 8:39 PM
Share

नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घरफोडी करण्यात येत होती. नवी मुंबई परिसरातही अनेक ठिकाणी घरफोडी करून लूट करणारी टोळी गेल्या काही दिवसांपासून या परिसरात सक्रिय असल्याचे पोलिसांनी शक्यता वर्तवली होती. त्यामुळे पोलिसांनीही अशा चोऱ्या करणाऱ्या टोळीला अटक करण्यासाठी अनेक दिवसांपासून तपास यंत्रणा कामाला लावली होती. नवी मुंबई पोलिसांच्या या प्रयत्नामुळेच घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला जेरबंद करण्यात त्यांना यश आले आहे.

नवी पोलिसांनी ताब्यात घेतलेली अंतराज्य घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला जेरबंद करण्यात वाशी पोलीस ठाण्यातील पथकाला यश आले आहे.

मात्र ज्या वेळी या टोळीकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यावेळी तो कोट्यवधी रुपयांचा माल असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यामुळे आता पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे का त्याचा तपास केला जात आहे.

अंतराज्य घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीने वाशीमधील रो हाऊसमधून तब्बल 99 लाख 95 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता. त्या घरफोडीचा तपास नवी मुंबई पोलीस करत होते.

त्यामुळे याप्रकारणी पोलिसांनी तपास करून आरोपींना उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. त्यांची कसून चौकशी केली असता तब्बल 13 गुन्ह्यांची कबूल या टोळीने दिली आहे.

या टोळीने आरोपींकडून विविध गुन्ह्यात चोरलेला 30 लाख 17 हजार रुपये किंमतीचा चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. यासोबतच या टोळीतील आणखी 2 जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.