AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाद सोडून जनतेला न्याय दिला पाहिजे, नवनीत राणा यांचा दोन्ही आमदारांना सल्ला

वाद सोडून आपण जनतेला न्याय दिला पाहिजे, असं मत खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केला.

वाद सोडून जनतेला न्याय दिला पाहिजे, नवनीत राणा यांचा दोन्ही आमदारांना सल्ला
बच्चू कडू, रवी राणा विकासाकडं लक्ष देणार? Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Nov 03, 2022 | 9:38 PM
Share

मुंबई : आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात वार-प्रतिवार सुरू होते. रवी राणा यांनी आधी खोक्यांचा आरोप केला. बच्चू कडू यांनी पुरावे मागितले. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर कुणी दम देऊन बोलत असेल तर त्याला घरात घुसून मारायला हिंमत असल्याचं रवी राणा म्हणाले. त्यांनी तलवार घेऊन द्यावं, मी तयार आहे, असं बच्चू कडू यांना प्रतिउत्तर दिलं. नंतर रवी राणा म्हणतात, तो वाद पूर्णपणे मिटलेला आहे. बच्चू कडू यांनीही तो वाद मिटला असल्याचं सांगितलं.

रवी राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर वाद मिटल्याचं म्हटलं. कोणी कोणत्याही शब्दाचं वेगळे अर्थ पकडू नये. राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचे आदेश माझ्यासाठी सर्वस्व असल्याचं रवी राणा म्हणाले. विकासात्मक कामात लक्ष देणार असल्याचं रवी राणा यांनी सांगितलं. वाद-विवादात काही पडलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

वाद पेटला नाही नि मिटला पण नाही. कोथळा बाहेर काढण्याची भाषण मी काय एकटा करतो महाराष्ट्रात. बोलताना मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. याच्यानंतर वाद झाला तर ते भाषण आहे. घरात जाऊन मारणं, बोलणं हे फार सोप आहे. सामान्य माणसाच्या हिताचे असते तर वाद वाढविले असते. यात सामान्य माणसाचं हित कुठचं दिसत नाही. बच्चू कडू यांनीही वाद नाही, असंच म्हंटलं.

एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत. ते जसे बोलतील तसं आम्ही करतो. दोन्ही आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात मिसअंडरस्टँडिंग झालं असेल. वाद सोडून आपण जनतेला न्याय दिला पाहिजे, असं मत खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केला.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....