AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवाब मलिकांना 8 दिवसांची ईडी कोठडी! देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, ‘टेरर फंडिंग’चा गंभीर आरोप

काही वेळापूर्वीच मलिकांना न्यायालयाने आठ दिवासांची कोठडी सुनवाली आहे. त्यानंतर फडणवीस बोलत होते. दाऊद भारतातून टेरर फंडींग करतोय. आज ईडीने नऊ ठिकाणी सर्च केला. त्यातून अनेक लिंक बाहेर आल्या. त्यातलं एक प्रकरण नवाब मलिक यांच्याशी संबंधित आहे. असे फडणवीस म्हणाले.

नवाब मलिकांना 8 दिवसांची ईडी कोठडी! देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, 'टेरर फंडिंग'चा गंभीर आरोप
फडणवीसांचे मलिकांवर गंभीर आरोप
| Edited By: | Updated on: Feb 23, 2022 | 9:30 PM
Share

मुंबई : राज्यात सध्या मलिकांच्या (Nawab Malik Arrest) अटकेवरून जोरदार घमासान सुरू आहे. यावरूनच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार हल्लाबोल चढवत ही अटक कायदेशीर आहे, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी दाऊदशी संबंधित काही तिखट सवाल महाविकास (Mahavikas Aghadi) आघाडी आणि मलिकांना केले आहेत. काही वेळापूर्वीच मलिकांना न्यायालयाने आठ दिवासांची कोठडी सुनवाली आहे. त्यानंतर फडणवीस बोलत होते. दाऊद भारतातून टेरर फंडींग करतोय. आज ईडीने नऊ ठिकाणी सर्च केला. त्यातून अनेक लिंक बाहेर आल्या. त्यातलं एक प्रकरण नवाब मलिक यांच्याशी संबंधित आहे. मंत्र नवाब मलिक यांनी घेतलेली जमीन बॉम्बस्फोटातील आरोपांकडून घेतलीय. त्यातला एक हसीना पारकरचा ड्राईव्हर आहे. जमीनीच्या मालकांनी सांगितलं पैसे नाही मिळाले. असा आरोप फडणवीसांनी केला आहे, तर इतर काही मुद्द्यावरूनही फडणवीसांनी जोरदार बॅटिंग केली.

व्यवहाराबद्दल फडणवीस काय म्हणाले?

या जमिनीसाठी आमच्यावर दबाव टाकला. केवळ अतिक्रण काढण्याकरता पॉवर ऑफ अॅटोर्नी दिली. मात्र आम्हाला एकही पैसा मिळाला नाही. ज्या ठिकाणी हे सौदे झाले. ज्या ठिकाणी हसीना पारकर सौदा करत होती. त्या लोकांची साक्ष आहे. हसीन पारकरला 55 लाख दिल्याचे पुरावे ईडीकडे आहेत. ही जमीन अंडरवर्ल्डच्या मदतीने नवाब मलिकांना मिळाली. यातले सगळे पैसे अंडरवर्ल्डला गेले. हजारो कोटी हसीना पारकर म्हणजे दाऊदला गेले. एखाद्या मंत्र्याने बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन का घेतली? हसीना पारकशी व्यवहार का केला. या व्यवहारानंतर तीन वेळा बॉम्बस्फोट. जे लोकं बॉम्बस्फोट करतात अशा लोकांना पैसे देणे निंदनीय आहे. अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

सरकारने मलिकांना वाचवणे निंदनिय

तसेच ईडीने सर्वांचे जबाब घेतले आहेत. मूळ मालकांनी एकही पैसा मिळाला नाही असे सर्व सांगितले आहे. ईडीने केलेली कारवाई नियमानुसार आहे. अशा प्रकारे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि देशाचा दुष्मन दाऊच्या बहिणीशी व्यवहार कसा केला जाऊ शकतो. त्यामुळेच कोर्टाने त्यांना कस्टडी दिली आहे. हे अतिशय गंभीर आहे. कुठल्याही राजकीय पक्षाने टेरर फंडिंग होण्याला निषेध केला पाहिजे. यात राजकारण केलं नाही पाहिजे, सर्वांनी एकत्र दाऊदविरोधात भूमिका मांडली पाहिजे. तसेच माझ्याकडे जी कागदपत्र होती ती मी ईडी आणि एनआयएला दिली आहेत. असेही फडणवीस म्हणाले आहेत. देशात यामुळे अतिशय चुकीचा संदेस जाईल की दाऊदशी व्यवहार करणाऱ्याला सरकार वाचवतंय. असेही ते म्हणाले.

Breaking : नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी, तर मलिकांचा भाजपला सूचक इशारा!

Nawab Malik Arrest : नवाब मलिकांना अटक, आघाडीचे नेते काय करणार? पवारांच्या भेटीनंतर भुजबळांनी कार्यक्रम सांगितला

मलिकांचा राजीनामा घेऊ नका, कंस आणि रावण सुद्धा मारले गेले, संजय राऊत गरजले

Follow Us
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.