AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांवर लाठीचार्ज; मोदींची ही वागणूक शेतकरी कायम लक्षात ठेवतील: जयंत पाटील

केंद्र सरकारने शेतकरी आंदोलन योग्यप्रकारे न हाताळल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप केला. | Jayant Patil

शेतकऱ्यांवर लाठीचार्ज; मोदींची ही वागणूक शेतकरी कायम लक्षात ठेवतील: जयंत पाटील
शेतकऱ्यांना अडचणीच्या वाटणाऱ्या कायद्यात केंद्र सरकारने दुरुस्ती करायला पाहिजे होती.
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Jan 26, 2021 | 4:26 PM
Share

सांगली: भारताच्या प्रजासत्ताक दिनाला दिल्लीतील पोलीस शेतकऱ्यांवर (Farmers) लाठीमार करताना दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिलेली ही वागणूक शेतकऱ्यांच्या कायम लक्षात राहील, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jaynat Patil) यांनी केले. लोकशाहीत लवचिकता ठेवावी लागते. मात्र, कोणतीही लवचिकता न ठेवणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात आता शेतकरी अधिक त्वेषाने उठाव करुन आपल्या मागण्या मान्य करुन घेतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले. (Chaos in Delhi after Farmer Tractor Rally)

ते मंगळवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने शेतकरी आंदोलन योग्यप्रकारे न हाताळल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप केला. गेले अनेक दिवस भारतातील शेतकरी दिल्लीला गराडा घालून बसले होते. परंतु, सरकारने आडमुठेपणा दाखवत शेतकऱ्यांना दाद दिली नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले. मात्र, दिल्लीत घडलेला प्रकार दुर्दैवी असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

‘राजीनामा तो बनता है साहेब; संजय राऊत यांची मागणी’

दिल्लीत शेतकरी आंदोलन पेटल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. शेतकरी आंदोलनामागे कोणती अदृश्य शक्ती राजकारण करत आहे?, असा सवाल करतानाच दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे राजीनामा तो बनता है साहेब, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. राऊत यांचा रोख थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच दिशेने असल्याने शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक झाल्याची चर्चा आहे.

हिंसा हा पर्याय नाही- राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणतीही समस्या सोडण्यासाठी हिंसा हा त्याचा पर्याय असूच शकत नाही. कुणालाही मार लागला तरी आपल्या देशाचंच नुकसान होणार आहे, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षेत वाढ

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आता दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवासस्थान असलेल्या 7 लोककल्याण मार्गावरील सुरक्षाव्यवस्थेतही कमालीची वाढ करण्यात आल्याचे समजते.

संबंधित बातम्या:

Delhi Farmer Protest : दगडफेक, लाठीचार्ज ते घमासान, शेतकरी आंदोलनातील 10 मोठ्या घडामोडी

Delhi Farmers Tractor Rally VIDEO : भयानक विद्रोह! आंदोलकांकडून पोलिसांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न

मग शेतकऱ्यांना गोळ्या घालायच्या का?; शेतकरी नेते टिकैत यांचा संतप्त सवाल

(Chaos in Delhi after Farmer Tractor Rally)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...