AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे जिहाद हृदयसम्राट, ते मुंबईचं नाव बदलून…; भाजप आमदाराची टोकाची टीका

नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली असून ठाकरे कुटुंब मूळचे महाराष्ट्राचे आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे. मुंबईचा विकास फक्त देवेंद्र फडणवीस यांनीच केल्याचा दावा करत त्यांनी ठाकरेंना 'लुटारू' संबोधले आहे.

उद्धव ठाकरे जिहाद हृदयसम्राट, ते मुंबईचं नाव बदलून...;  भाजप आमदाराची टोकाची टीका
raj thackeray uddhav thackeray
| Updated on: Jan 09, 2026 | 12:57 PM
Share

राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना आता मोठा वेग आला आहे. महापालिका निवडणुकांचे वारे वाहत असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध शिगेला पोहोचले आहे. त्यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे हे जरी मुंबईत जन्माला आले असले, तरी मूळ ठाकरे कुटुंब महाराष्ट्राचे आहे का, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. आम्ही मुळापर्यंत पोहोचायचं का, मूळ बाहेर काढायचं का? मग आम्हालाही तोंड उघडायला लागेल, असा इशाराही नितेश राणेंनी यावेळी दिला.

त्यांनी मुंबईसाठी नक्की काय दिवे लावले?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा जन्म मुंबईत झाला असला तरी त्यांनी मुंबईसाठी नक्की काय दिवे लावले. त्यांनी फक्त बांगलादेशी आणि रोहिंगे वाढवले, मुंबईचे हिरवीकरण केले. देवेंद्र फडणवीसांनी मुंबईच्या विकासासाठी आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे काम केले, ते यांना इतक्या वर्षांत जमले का? असा टोला नितेश राणेंनी लगावला. उद्धव ठाकरेंना फक्त मातोश्री १ चे मातोश्री २ करणेच जमले, अशी टीकाही नितेश राणेंनी केली आहे.

हे फक्त लुटारु

मुंबई हे त्यांच्यासाठी खाण्यासाठी, पोट भरण्यासाठी आणि बाहेरगावचे दौरे करण्यासाठीच महापालिकेची सत्ता होती. मुंबईला खऱ्या अर्थाने ज्यांनी कोणी विकसित केलं असेल, तर ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. हे फक्त लुटारु आहेत. जिहाद हृदयसम्राट उद्धव ठाकरे हे फक्त लुटारु आहेत, असे नितेश राणे म्हणाले.

सुरक्षित ठेवणाऱ्या लोकांच्या हातातच मुंबई दिली पाहिजे

जर १५ तारखेला मुंबईकर सतर्क राहिले नाहीत, तर हे लोक मुंबईचे नाव बदलून मोहम्मद लँड करून टाकतील. त्यांची तशी तयारी असून त्यासाठी ते फतवेही काढतील. त्यामुळे मतदारांनी सुरक्षित ठेवणाऱ्या लोकांच्या हातातच मुंबई दिली पाहिजे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

बाळासाहेबांच्या नावाने महापौर बंगला हडपला

यावेळी नितेश राणेंनी महापौर बंगल्यावरूनही निशाणा साधला. आम्ही पाकिस्तानचे आहोत का, आम्ही मूळ मुंबईकर आहोत. महाराष्ट्राच्या बाहेरचे नाही. आम्ही बाहेरुन आलेल नाही. नाहीतर मग एक पत्रकार परिषद घेऊन कोण कुठून आलं, ठाकरे बंधूंना दाखवावं लागेल. त्यामुळे कोणाच्या मुळापर्यंत जाण्याआधी आमच्याकडेही बघा. बाळासाहेबांच्या नावाने महापौर बंगला हडपला. तिथे तुमचा मुलगा नाईटलाईफची थेर करतो. हे तुम्ही केलं, असा गंभीर आरोप नितेश राणेंनी केला.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत