AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना रस्ते ना पूल; वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून करावा लागतो धोकादायक प्रवास

पावसाळ्यात चारही महिने पिंजाळ नदी दुधडी भरून वाहते. या काळात गावात शिक्षकही पोहोचू शकत नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशीही खेळ सुरू आहे.

ना रस्ते ना पूल; वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून करावा लागतो धोकादायक प्रवास
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jul 25, 2023 | 3:20 PM
Share

पालघर : पालघर जिल्ह्याच्या जव्हार, मोखाडा, विक्रमगड या दुर्गम भागात ग्रामीण गावपाड्यांना जोडणारे रस्ते आणि पूल नाही. नागरिकांना वाहत्या नद्यांमधील पाण्याच्या धोकादायक प्रवाहातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचं वारंवार उघड होतंय. मोखाडा तालुक्यातील कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास चार ते पाच पाड्यांना जोडणारा पिंजाळ नदीवर पूल नाही. येथील नागरिकांना वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. हे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे.

पाड्यांची लोकसंख्या ५००

कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील शेंड्याचा पाडा, आंबे पाडा, रायपाडा आणि जांभूळपाडा या पाड्यांमधील नागरिकांना पावसाळ्यात नदीच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. या पाड्यांची लोकसंख्या 500 पेक्षा अधिक आहे. मात्र गावाबाहेर पडण्यासाठी येथील ग्रामस्थांना पिंजाळ नदी पार करावी लागते. या नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते.

चार महिने नदी दुथळी वाहते

पावसाळ्यात चारही महिने पिंजाळ नदी दुधडी भरून वाहते. या काळात गावात शिक्षकही पोहोचू शकत नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशीही खेळ सुरू आहे. दुसऱ्या बाजूला गावात कोणी आजारी पडल्यास लाकूड आणि चादरीच्या साह्याने डोली करून येथील रुग्णांना लाकडी फळीच्या आधारावर नदी पार करावी लागते. अशी माहिती उपसरपंच मोहन मोडक यांनी दिली.

पिंजाळ नदीवर पुलाची मागणी

मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी पिंजाळ नदीवर पूलाची मागणी होत आहे. याकडे प्रशासन आणि सरकार मात्र डोळेझाक करत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे लवकरात लवकर पिंजाळ नदीवर पूल उभारून शेंड्याचा पाडा, आंबे पाडा, रायपाडा आणि जांभूळपाडा या गावातील नागरिकांना गावा बाहेर पडण्यासाठी दिलासा द्यावा, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे.

शेकडो पाड्यांवर नाहीत रस्ते

पालघर जिल्ह्यात आजही शेकडो गावपाड्यांवर जाण्यासाठी मुख्य रस्ते नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात येथील नागरिकांना गावाबाहेर ये-जा करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागतोय. मुंबई, ठाणे या महानगरालगत असलेल्या पालघर जिल्ह्यात हे भीषण वास्तव दिवसेंदिवस उघड होत आहे. सरकार याची दखल कधी घेणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....