AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेकासह छोट्या पाहुण्याला घेऊन शेतावर, दोघेही पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले, बुडताना पाहून बापाचे वाचवण्याचे प्रयत्न, पण तिघेही बुडाले

चिमुरड्यांना बुडताना पाहून सुनील पंडित यांनी शेततळ्यात उडी घेतली. त्यांनी दोघांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. आपला चिमुरडा लेक, घरी आलेला छोटा पाहुणा आणि स्वत: सुनील पंडित यांचा या दुर्घटनेत बुडून मृत्यू झाला. (beed Three people drowned in a farm pond) 

लेकासह छोट्या पाहुण्याला घेऊन शेतावर, दोघेही पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले, बुडताना पाहून बापाचे वाचवण्याचे प्रयत्न, पण तिघेही बुडाले
तिघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू...
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Jun 11, 2021 | 8:14 AM
Share

बीड : आपल्या मुलासह घरी आलेल्या छोट्या पाहुण्याला घेऊन सुनिल पंडित गावाकडच्या शेतात गेले. शेतात शेततळं पाहिल्यानंतर मुलांचा आनंद गगनात मावेना. त्यांनी पोहण्याचा नाद धरला. मग सुनिल पंडित यांचा 12 वर्षांचा मुलगा मुलगा आणि पत्नीचा भाचा 10 वर्षीय आदित्य शेततळ्यात पोहोण्यासाठी उतरले. पण ते बुडू लागले. त्यांना वाचवायला सुनिल पंडित स्वत: शेततळ्यात उतरले पण काहीच उपयोग झाला नाही. या घटनेत तिघांचाही बुडून मृत्यू झाला आहे. (beed Three people drowned in a farm pond)

ही दुर्दैवी घटना गेवराई तालुक्यातील दैठण येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.  या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये सुनिल जग्गनाथ पंडित (वय 40), त्यांचा मुलगा राज पंडित (12) आणि सुनील पंडित यांच्या पत्नीचा भाचा आदित्य पाटील (10, रा. शेवगाव) या तिघांचा समावेश आहे.

शेततळ्यावर गेले पण माघारी आलेच नाही…!

गेवराई येथे सुनील पंडित यांचा चार चाकी वाहन खरेदी विक्रीसह फायनान्सचा व्यवसाय आहे. ते मागील काही वर्षांपासून शहरातच वास्तव्यास आहेत. दरम्यान, पंडित हे गुरुवारी दुपारी मुलगा राज व पत्नीचा भाचा आदित्य या दोघांना घेऊन त्यांच्या दैठण येथील शेतात गेले होते. यानंतर ते शेतातील शेततळ्यावर गेले होते. यावेळी राज आणि सुनील यांचा भाचा आदित्य पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले असता ते दोघे पाण्यात बुडू लागले. हे पाहून सुनील पंडित यांनी त्या दोघांना वाचवण्यासाठी शेततळ्यात उडी मारून मारली.

चिमुरड्यांना बुडताना पाहून सुनील पंडित यांनी शेततळ्यात उडी घेतली. त्यांनी दोघांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. आपला चिमुरडा लेक, घरी आलेला छोटा पाहुणा आणि स्वत: सुनील पंडित यांचा या दुर्घटनेत बुडून मृत्यू झाला.

(beed Three people drowned in a farm pond)

हे ही वाचा :

नागपूरच्या चिमुकलीला दुर्धर आजार, एका इंजेक्शनची किंमत तब्बल 16 कोटी रुपये

Video : पावसाचं रौद्ररुप, नदीला पूर, दोन तरुण दुचाकीसह पुरात वाहून गेले, पण…..

Follow Us
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!