AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकरी फाशी घ्यायला निघाला होता, प्रीतम मुंडे यांचा फोन येताच रडू लागला; म्हणाला, ताई काही राहिलच नाही

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याने काल आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गावच्या सरपंचाने त्या सरपंचाला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं. त्यानंतर खासदार प्रीतम मुंडे यांनी या शेतकऱ्याशी संवाद साधून त्याला दिलासा दिला.

शेतकरी फाशी घ्यायला निघाला होता, प्रीतम मुंडे यांचा फोन येताच रडू लागला; म्हणाला, ताई काही राहिलच नाही
pritam mundeImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 10, 2023 | 1:59 PM
Share

बीड : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी गारपीटही झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. हाता तोंडाशी आलेला घास निघून गेल्याने शेतकऱ्यांवर तर आभाळच कोसळलं आहे. काल बीडच्या केज, परळीमध्ये दुपारी प्रचंड पाऊस झाला. संध्याकाळपर्यंत धोधो पाऊस सुरू होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात चिखल झाला आहे. सर्व पिके नष्ट झाली आहेत. लाखोंचा माल हातातून गेला आहे. वर्षभर उन्हातान्हात कष्ट केलं आणि पावसाने वाहून गेलं… त्यामुळे हवादिल झालेल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती मिळताच भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि त्यांना धीर दिला. प्रीतम मुंडे धीर देत असताना या शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बीड जिल्ह्यातील जवळपास शंभर गावे बाधित झाली आहेत. परळी आणि केजमध्ये काल अवकाळी पावसाने थैमान घातलं. त्यामुळे संपूर्ण पिके नष्ट झाल्याने एक शेतकरी पुरता कोलमडून पडला. या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला गावच्या सरपंचाने आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं. त्यानंतर हा प्रकार खासदार प्रीतम मुंडे यांना सांगण्यात आला. त्यावेळी प्रीतम मुंडे यांनी फोन करून या शेतकऱ्याशी संवाद साधत दिलासा दिला. हिंमत हारु नका, तुम्हाला तात्काळ मदत मिळवून देऊ. पण तुम्ही आत्महत्येचा विचार डोक्यातून काढून टाका, असं मुंडे यांनी सांगितलं. प्रीतम मुंडे आणि या शेतकऱ्याच्या संभाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियातून चांगलाच व्हायरल होत आहे.

प्रीतम मुंडे आणि शेतकऱ्याचा संवाद जशाच्या तसा

शेतकरी : हां ताई

प्रीतम मुंडे : हां दादा

शेतकरी : दोन एकर ज्वारीचं नुकसान हे. अजूनही 3 वाजता गारा पडल्यात हे. मी फाशी घ्यायला लागलो होतो. पण सरपंच आणि माजी चेअरमनने मला खाली उतरवलं.

प्रीतम मुंडे : फाशी कशामुळे घेताय तुम्ही…?

शेतकरी : अहो ताई काही राहिलच नाही ताई…

प्रीतम मुंडे : नाही नाही नाही… राज्यातलं सरकार आता बदललेलं आहे. आपण मदत करू. आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी करू जीव कशाला देताय?

शेतकरी : जगावं कशावर आता…? ज्वारी आणि गहू सर्व गेली. वांगी गेली. पाऊस काल दुपारी 3 वाजता जे सुरू झाला ते संध्याकाळी 6.30ला उघडला.

प्रीतम मुंडे : मी दवाखान्यात आहे. माझी आई अॅडमिट आहे. मी अचानक दौरा रद्द केला आहे. बीडीओ आले आहेत ना? मी त्यांच्याशी बोलते. जिल्हाधिकाऱ्यांशी बोलते. काळजी करू नका. हिंमत हारू नका. तुम्हाला मदत मिळवून देण्याची जबाबदारी आमच्यावर आहे.

शेतकरी : ताई तुमच्या बोलण्यावर विश्वास आहे.

प्रीतम मुंडे : शंभर टक्के तुम्हाला मदत मिळवून देऊन. काळजी करू नका.

प्रीतम मुंडे : केजची काय परिस्थिती आहे?

अधिकारी : आठ दहा गावात पिके उद् ध्वस्त झाली आहे. पंचनामे करायला सांगितले आहेत… सरपंच आणि तलाठ्यांना.

प्रीतम मुंडे : मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलते. मदत करायला सांगते. तात्काळ पंचनामे करा. आपल्या जिल्ह्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करा. मी मुख्यमंत्र्यांशी बोलते

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?