AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“दिवा विझायच्या अगोदर फडफडतो, तशी अवस्था उद्धव ठाकरे यांची”; ठाकरेंवर कुणी केला घणाघात…

राजकारणात आता त्यांना शरद पवार हा शेवटचा पर्याय वाटतो आहे. पवार साहेबांची भांडी घासल्याशिवाय त्यांना राजकीय जीवदान मिळणार नाही हे त्यांना चांगलं माहिती असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

दिवा विझायच्या अगोदर फडफडतो, तशी अवस्था उद्धव ठाकरे यांची; ठाकरेंवर कुणी केला घणाघात...
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Apr 13, 2023 | 4:46 PM
Share

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवरून आमदार आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगले आहे. आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते. ईडी आणि सीबीआयच्या भीतीमुळे त्यांनी बंडखोरी केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला. त्यावरून आता राजकारण तापले आहे. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार संतोष बांगर यांनी त्यांच्यावर जोरदार निशाा साधला होता. आदित्य ठाकरे यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. तर आता भाजपनेही त्यांच्या या आरोपांवरून ठाकरे कुटुंबाला त्यांनी लक्ष्य केले आहे.

आदित्य ठाकरे यांनी टीका केली असली तरी या वादात आता उद्धव ठाकरे यांना ओढून माजी खासदार निलेश राणे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

माजी खासदार निलेश राणे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी ठाकरे कुटुंबीयांना आता कुणाचा ना कुणाचा आधार घेतल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्यांच्याकडून वाटेल ते आरोप केले जात असल्याची टीका त्यांनी केली आहे.

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आता काहीच राहिले नाही त्यामुळे ठाकरे कुटुंबीयांकडून असे आरोप केले जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे आता पक्ष राहिलेला नाही, त्याच बरोबर ते आता एका मित्रमंडळाचे फक्त अध्यक्ष राहिलेले आहेत.

त्याचबरोबर तेही लावारीस गटाचे प्रमुख राहिले आहेत असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे आता हे राजकारण आणखी तापणा असल्याचे दिसून येत आहे.

उद्धव ठाकरे यांना आता शरद पवारांकडे जाणे त्यांना भागच आहे. सध्या त्यांची अवस्था म्हणजे दिवा विझायच्या अगोदर फडफडतो ना, तशी अवस्था उद्धव ठाकरे यांची झाली आहे.

राजकारणात आता त्यांना शरद पवार हा शेवटचा पर्याय वाटतो आहे. पवार साहेबांची भांडी घासल्याशिवाय त्यांना राजकीय जीवदान मिळणार नाही हे त्यांना चांगलं माहिती असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

त्यामुळे आता कितीही प्रयत्न केला तरी त्यांना जास्त यश मिळणार नाही. उद्धव ठाकरे कसे आहेत हे महाराष्ट्राला आता कळले असल्यामुळे उद्धव ठाकरे यांना कुठल्याच गोष्टीत यश मिळणार नाही असा घणाघात त्यांनी त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे राणे आणि ठाकरे वाद टोकाला जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Follow Us
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...