AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करा”; ‘या’ मंत्र्याने दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

वादळी वारा झाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांच्या घरांचे पत्रे उडून गेल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे.

वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करा; 'या' मंत्र्याने दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jun 11, 2023 | 6:58 PM
Share

चंद्रपूर : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नागरिकांच्या घरांचे आणि शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते. वादळी वाऱ्यामुळे अनेक नागरिकांना मोठा फटका बसला आहे. तर अनेकांच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आता प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. हे पंचनामे करताना कोणताही नागरिक त्यातून वगळला जाऊ नये अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत. जिल्ह्यात वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांच्या घरांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्‍यक्ष मोक्‍यावर पंचनामे करून तात्काळ आपदग्रस्तांना मदत करण्याचे आदेश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

या वादळी वाऱ्यांमुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकरी, नागरिक यांच्या पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे. यांसदर्भात नुकसानीचे सर्व्हेक्षण करून पंचनामे करावे व नुकसान भरपाई तात्काळ अदा करण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी तातडीने चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशामुळे नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वादळी वारा झाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांच्या घरांचे पत्रे उडून गेल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे.

एकीकडे पावसामुळे शेतीच्या पिकांचे नुकसान तर दुसरीकडे शेतमालाला बाजारभाव मिळाला नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.सध्या मंत्री मुनगंटीवार यांच्या आदेशामुळे नुकसानग्रस्त नागरिकांसह शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान झाले आहे.

Follow Us
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले; म्हणाले...
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे दर्शन
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी...
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पांचे दर्शन, पहा खास व्हिडीओ