VIDEO: साखर कारखाना काढण्यावर बंदी आणली पाहिजे, गडकरींचे साखरसम्राटांना धक्क्यावर धक्के

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील साखर कारखान्यांना धक्क्यावर धक्के दिले आहेत. राज्यात साखर कारखाने काढण्यावर बंदी आणली पाहिजे, असं मोठं विधान नितीन गडकरी यांनी केलं आहे. (don't give permission for new sugar factory in india, says nitin gadkari)

VIDEO: साखर कारखाना काढण्यावर बंदी आणली पाहिजे, गडकरींचे साखरसम्राटांना धक्क्यावर धक्के
nitin gadkari
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 2:26 PM

नगर: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील साखर कारखान्यांना धक्क्यावर धक्के दिले आहेत. राज्यात साखर कारखाने काढण्यावर बंदी आणली पाहिजे, असं मोठं विधान नितीन गडकरी यांनी केलं आहे. तसेच हे विधान करण्यामागची कारणमिमांसाही त्यांनी केली आहे.

नितीन गडकरी यांनी नगरमध्ये विकास कामांचं भूमिपूजन केलं. नव्या घोषणाही केल्या. तसेच साखर सम्राटांना धक्क्यावर धक्केही दिले. आपल्या देशात 240 लाख टन साखरेची गरज आहे. मागच्या वर्षी आपण निर्मिती केली 310 लाख टन साखरेची. म्हणजे आपण 70 लाख टन साखर अधिक तयार केली. त्यामुळे मी म्हणतो महाराष्ट्राने आणि देशाने आता नवीन साखर कारखाने काढण्यास बंदी आणली पाहिजे. नाही तर परिस्थिीती खराब होईल. साखर कोणी घेतच नाही. हे अर्थचक्र जर उलटं फिरलं तर शेतकऱ्यांना परवडणार नाही, बँकाही डुबतील आणि कारखानेही बंद पडतील, अशी धोक्याची सूचनाही गडकरींनी दिली.

म्हणून साखरेत तेजी आली

ब्राझिलमध्ये दोन महिन्यापूर्वी 22 रुपये किलो साखरेचा भाव होता. आम्ही कमीत कमी 31 रुपये किलो साखरेचा भाव ठेवला होता. त्या कमिटीत मी सुद्धा आहे. आम्हाला साखरेचा भाव 2 रुपयांनी वाढवायचा होता, पण वाढवला नाही. कारण साखर महाग होईल असं सर्वांना वाटलं. पण आज मात्र ब्राझिलमध्ये साखरेचं उत्पादन कमी आहे. तिकडे दुष्काळ आहे. त्यामुळे दोन तीन महिन्यात साखरेत थोडी तेजी आली. त्यामुळे येणारी साखर जास्तीत जास्त निर्यात करणं आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांचं शोषण करू नका

मी नेहमी स्पष्ट बोलतो. मला साखर कारखानदारी समजल्यामुळे, मी मागच्या जन्मी पाप केल्यामुळे मी साखर कारखानदारीतून बाहेर पडलो आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार मी तीन साखर कारखाने चालवत होतो. साखर कारखानदारीतून आपण बाहेर पडू शकतो. हे कसं शक्य होणार. आपण हे समजून घेतलं पाहिजे की शेतकरी जिवंत राहिले तर कारखाने जिवंत राहतील. कारखान्याची नरडी पकडून बंद करायचं ठरवलं अन् तुमचा ऊसच घेणारे टिकले नाही तर ऊस कुठं पिकवणार तुम्ही. त्यामुळे साखर कारखान्यांनी शेतकऱ्याचं शोषण करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

ऊसापासून साखर हे सूत्र आता कमी करावं लागेल

अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हजारो एक शेती पीक नष्ट झालं आहे. शेतकऱ्यांना वाटतं की आज खऱ्या अर्थानं आधार देणारं पीक हे ऊस आहे. सध्या एकच पीक घेण्याची प्रवृत्ती शेतकऱ्यांमध्ये वाढली आहे, ते पीक म्हणजे ऊस. अशावेळी ऊसापासून साखर हे सूत्र आता कमी करावं लागेल आणि इथेनॉल क्षेत्रात आपल्याला जावं लागेल. याबाबत गडकरी लक्ष घालतील अशी अपेक्षा असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सांगितलं.

संबंधित बातम्या:

नगर जिल्ह्यासाठी तीन मोठ्या घोषणा, गडकरी मिष्किलपणे म्हणाले, असं वाटतं, मी महाराष्ट्राचा पीडब्ल्यूडी मिनिस्टर झालोय!

सुजय विखे म्हणाले, नगरला सर्वाधिक रस्ते मिळाले, गडकरी म्हणाले, ‘जिकडं जाईल तिकडचे असेच म्हणतात!’

प्रत्येक भाषणात नितीन गडकरी म्हणतात ऊसापासून इथेनॉल निर्मिती करा, आज पवारांनी त्याच्या पुढचा पर्याय गडकरींना सांगितला!

(don’t give permission for new sugar factory in india, says nitin gadkari)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.