AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akola water | लोहारा येथे पाण्यासाठी मारामारी, पाण्यासाठी मोजावे लागतात पैसे, विहिरींमध्ये ठणठणाट

200 लिटर पाण्यासाठी 60 रुपये मोजावे लागत आहेत. तर 15 लिटर पिण्याच्या पाण्यासाठी 10 रुपये मोजावे लागतात. शेतामध्ये दिवसभर कष्ट करून मजुरांला 100 रुपये मिळतात. त्यामधून पाण्यावर खरंच खर्च करण शक्य आहे का?

Akola water | लोहारा येथे पाण्यासाठी मारामारी, पाण्यासाठी मोजावे लागतात पैसे, विहिरींमध्ये ठणठणाट
अकोला जिल्ह्यातील लोहार येथे पाणीटंचाईImage Credit source: tv 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Apr 02, 2022 | 5:20 AM
Share

अकोला : जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील (Balapur taluka) लोहारा येथील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. लोहारा नागरिक मागील काही दिवसांपासून पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. या पाणीटंचाईकडे ग्रामपंचायत व संबंधित अधिकारी लक्ष देतील का, असा प्रश्न आहे. प्रशासन सुस्त असून उपाययोजना शून्य, तर गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. बाळापूर तालुक्यातील लोहारा येथे भीषण पाणीटंचाई (Water scarcity) निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना, लहान मुलांना, वणवण भटकावे लागत आहे. परिणामी महिलांमध्ये असंतोष पसरला आहे. पाण्याची पातळी खोल गेल्याने लोहारा येथील संपूर्ण विहिरी कोरड्या (wells dry) पडलेल्या आहेत. तसेच मन नदी सुध्दा कोरडी  झाली आहे. पाण्याची पातळी खोल गेल्याने पाण्यासाठी दूरवर जावे लागत आहे. भर उन्हामध्ये शेतातील विहिरीचे पाणी आणावे लागत आहे. गावामध्ये चार हातपंप आहेत. त्यापैकी एक हातपंप मार्च महिन्यापूर्वीच पाण्याअभावी बंद पडला. तर दुसरा हातपंप येत्या दोन ते चार दिवसांत बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

विहीर आहे पण पाण्याचा ठणठणाट

लोहारा येथे सतत पाणीटंचाई भासत आहे. पाणीटंचाईवर पाहिजे त्या प्रमाणात प्रशासनाकडून उपाययोजना केली गेली नाही. मार्च महिन्यापासून पाण्याची भीषण टंचाई भासत आहे. एप्रिल, मे आणि जून महिना शिल्लक आहे. लोहारा गावाची लोकसंख्या आठ हजारांच्या वर आहे. गावामध्ये ग्रामपंचायतीची विहीर आहे. पण तिची पाण्याची पातळी खोल गेल्याने ती बंद पडली आहे. गावकऱ्यांना पिण्याचे पाणीसुद्धा पुरेसे मिळत नाही. लोहारा येथे भीषण पाणीटंचाई आहे. त्यामुळे गावात पिण्याचे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची पायपीट होत आहे. एकीकडे महागाईने डोके वर काढले आहे.

पाण्यासाठी मोजावे लागतात पैसे

आज तेलाचे भाव 180 ते 200 रुपये किलो झाले आहेत. परंतु शेतमजुरांना 100 रुपये मजुरी मिळत आहे. त्यात आणखीन भर 200 लिटर पाण्यासाठी 60 रुपये मोजावे लागत आहेत. तर 15 लिटर पिण्याच्या पाण्यासाठी 10 रुपये मोजावे लागतात. शेतामध्ये दिवसभर कष्ट करून मजुरांला 100 रुपये मिळतात. त्यामधून पाण्यावर खरंच खर्च करण शक्य आहे का? एवढ्या कमी पैशात घरांमध्ये खायाला कायकाय आणावे असे अनेक प्रश्न लोहारा येथील मजुरांना पडतो. त्यामुळं लोहारा येथील नागरिकांची पाण्याची समस्या प्रशासनाने दूर करावी अशी मागणी गावकरी करत आहेत.

Video leaders’ reel funda | सोशल मीडियावर राजकीय रिलची चर्चा; फडणवीस, अजित दादा, मुख्यमंत्र्यांचेही रिल

Gondia help | घरी मुलीचं लग्न होतं, आगीत संपूर्ण वस्तू जळाल्या; अधिकारी-लोकप्रतिनिधींनी कुटुंबाला सावरलं

Devendra Fadnavis on Satish Uke arrest: कायद्याने जे व्हायचं तेच होईल, उके यांच्या अटकेनंतर फडणवीसांची पहिलीच प्रतिक्रिया

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....