AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाई करा, सोमय्यांचे थेट ठाकरे सरकारलाच आव्हान

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सीआरझेडचं उल्लंघन करून बंगला बांधला असेल तर त्यावर कारवाई करा.

तर नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाई करा, सोमय्यांचे थेट ठाकरे सरकारलाच आव्हान
किरीट सोमय्या, भाजप नेते
| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 6:32 PM
Share

रत्नागिरी: केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सीआरझेडचं उल्लंघन करून बंगला बांधला असेल तर त्यावर कारवाई करा, असं आव्हानच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला दिलं आहे.

किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आव्हान दिलं. अनिल परब यांच्या बंगल्याबाबत बोलता नारायण राणेंच्या बंगल्याबाबत का बोलत नाही? असा सवाल मला केला जातो. राज्यात सरकार कुणाचं आहे? कोस्टल झोन अॅथोरीटी पर्यावरण खात्याकडे आहे. त्याचे मंत्री आदित्य ठाकरे आहेत. त्यामुळे मग राणेंनी काही चुकीचं केलं असेल तर करा कारवाई. पुरावे असतील तर पुढे जा, असं सांगतानाच तुम्ही कारवाई करत नाहीत. याचा अर्थ उद्धव ठाकरे आणि राणेंमध्ये सेटिंग झाली आहे का? असा सवाल सोमय्या यांनी केला. राणेंवर ठाकरे आणि परब यांनी आरोप केले आहेत. त्याबद्दल त्यांनाच विचारा असंही ते म्हणाले.

जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली

उद्धव ठाकरे सरकारचा उजवा हात अनिल परब यांचे रिसॉर्ट केव्हा पाडणार? असा सवाल त्यांनी यावेळी केला. मिलिंद नार्वेकर यांचा बंगला पाडण्याचे निर्देश दिले होते. रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये या संदर्भात सुनावणी होणार आहे. त्यावेळी हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकायुक्तांकडे ही सुनावणी आहे. किरीट सोमय्या सांगतात ते खरं आहे असं राज्य सरकारने सांगितलं आहे. अनिल परब यांनी खोट्या पद्धतीने एनए केले. जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांची भेट झाली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

लॉकडाऊनमध्ये रिसॉर्ट बांधला

अकृषी परवाना गैरकायदेशीर रित्या करण्यात आला होता. प्रत्यक्ष 1700 स्केअर मीटर बांधकाम करण्यात आलंय. अनिल परब खोटारडे आहेत. चिटर आहेत. त्यांनी सरकारची फसवणुक केली आहे. सदानंद कदम यांना शेती जमीन म्हणून विकलीय. पर्यावरण मंत्रालयाने सेटेलाईट मॅपमध्ये बांधकाम मे 2017 नंतर सुरु झाल्याचं सांगितलं आहे. अनिल परब यांनी रिसॉर्टचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी 20 मार्च 2020 रोजी घेतले होते. परब यांनी महावितरणकडून आपला रिसॉर्ट बांधकाम पूर्ण करण्यासाठी थ्री फेज कनेक्शन घेतले होते. संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन असताना परब यांनी रिसॉर्ट बांधायला घेतला होता, असंही त्यांनी सांगितलं.

आदित्य यांनी मेट्रोची वाट लावली

यावेळी त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली. आदित्य ठाकरे यांनी मुंबई मेट्रोची वाट लावली. पर्यावरण मंत्रालयाने पाच महिने आदेश देवून बेकायदेशीर रिसॉर्ट का पाडलं जात नाही? असा सवाल त्यांनी केला. सदानंद कदम यांच्या अकाऊंटमधून 5 कोटी रुपये रिसॉर्टसाठी खर्च केले आहेत असं सीएच पत्र आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

ST Workers Strike : गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत सह्याद्री अतिथीगृहावर दाखल, आज तोडगा निघणार?

कृषी कायदा मागे घेण्याबाबत पंतप्रधान मोदींची बुधवारी महत्त्वाची बैठक, क्रिप्टोकरन्सीबाबतही मोठी घोषणा होण्याची शक्याता

तिजोरीत 600 कोटी पण कोरोनाकाळात जनतेला वाऱ्यावर सोडलं, मृतांच्या वारसांना मदत करा, भाजपची मागणी

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.