कोल्हापूर: राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर पहिल्यांदाच भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात आले आहेत. कोल्हापुरात येऊन सोमय्या यांनी थेट हसन मुश्रीफ यांच्यासह ठाकरे गटावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला वचन दिलं आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ प्रकरणाची चौकशी होणारच आहे, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. सोमय्या यांनी थेट कोल्हापुरात येऊन हे विधान केल्याने खळबळ उडाली आहे.