AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंधुदुर्गातून गोव्याला जाणारे कृष्णा बार्ज समुद्रात बुडाले, चार जण बेपत्ता

बार्ज बुडत असताना त्याच्या आजूबाजूला असलेल्या केरळच्या तीन वेगवेगळ्या मासेमारी नौकांनी बार्जमधील तिघांना वाचवलं होतं. सध्या गोवा तटरक्षक दल समुद्रात सर्च ऑपरेशन करत आहे. गोवा तटरक्षक दलाने वाचवलेल्या 5 जणांना उपचारासाठी गोव्यातील बांबुळी मेडिकल कॉलेज येथे नेण्यात आले आहे.

सिंधुदुर्गातून गोव्याला जाणारे कृष्णा बार्ज समुद्रात बुडाले, चार जण बेपत्ता
सिंधुदुर्गातून गोव्याला जाणारे कृष्णा बार्ज समुद्रात बुडाले
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Dec 05, 2021 | 3:56 PM
Share

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला रॉक्सच्या उत्तरेला जयगडवरून गोव्याला निघालेलं कृष्णा बार्ज समुद्रात बुडालं. ही घटना 2 डिसेंबरची असून खराब हवामानाचा फटका या बार्जला बसला. कृष्णा बार्ज जेव्हा बुडाले तेव्हा त्यावर 10 क्रू मेंबर होते. बार्ज बुडत असल्याने 10 जणांनी समुद्रात उडी मारली. त्यातील 5 जणांना वाचवण्यात गोवा तटरक्षक दलाला यश आलं तर एकाचा मृतदेह मिळाला. अद्याप चार सदस्य बेपत्ता आहेत.

बेपत्ता चौघांचा तटरक्षक दलाकडून शोध सुरु

जयगड येथून गोव्यासाठी कृष्णा बार्ज निघाले होते. मात्र जोवाड चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हवामान खराब असल्याने हे बार्ज वेंगुर्ला रॉक्सच्या परिसरात बुडाले. बार्ज बुडत असल्याने गोवा तटरक्षक दलाने तात्काळ शोध आणि बचाव कार्यासाठी आपले चेतक हेलिकॉप्टर आणि तीन जहाजे पाठवली. बार्ज बुडत असताना त्याच्या आजूबाजूला असलेल्या केरळच्या तीन वेगवेगळ्या मासेमारी नौकांनी बार्जमधील तिघांना वाचवलं होतं. सध्या गोवा तटरक्षक दल समुद्रात सर्च ऑपरेशन करत आहे. गोवा तटरक्षक दलाने वाचवलेल्या 5 जणांना उपचारासाठी गोव्यातील बांबुळी मेडिकल कॉलेज येथे नेण्यात आले आहे.

जोवाड वादळाच्या प्रभावामुळे दुर्घटना

ओडिसा किनारपट्टीवर धडकलेल्या जोवाड वादळाचा प्रभाव दिसून आला आहे. विशेषतः महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात प्रभाव दिसून आला. सिंधुदुर्गात घडलेली बार्ज दुर्घटना हे त्याच्याच परिणाम आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्यास सांगण्यात आले आहे.

24 तासांत तीन राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्याने ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या उत्तर किनारपट्टी आणि लगतच्या भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. IMD ने म्हटले आहे की, “पुढील 24 तासांत, उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात आणि ओडिशा, पश्चिम बंगाल आणि उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. मच्छिमारांनाही या भागात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Krishna Barge on its way to Goa from Sindhudurg sank, four missing)

इतर बातम्या

Omicron Virus: ओमिक्रॉनचा धोका कुणाला?, काय करावं आणि काय नाही?; डॉ. भोंडवेंनी दिला लाखमोलाचा सल्ला

Sahitya Sammelan: ही तर संभाजी ब्रिगेडची उत्सफूर्त प्रतिक्रिया; भाजपकडून कुबेरांवरील शाई फेकीचं समर्थन

Follow Us
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी