AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Rane on MIM : त्यांच्या घरात कोण कोणाबरोबर झोपतो, MIM च्या प्रस्तावावर बोलताना नितेश राणे भलतेच बोलले

MIM ने लग्नाचा प्रस्ताव तिघांना द्यावा, त्यांनी लग्न करावे, हनीमून करावे हा त्यांचा आपापसातला प्रश्न आहे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची यावर तिखट प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

Nitesh Rane on MIM : त्यांच्या घरात कोण कोणाबरोबर झोपतो, MIM च्या प्रस्तावावर बोलताना नितेश राणे भलतेच बोलले
भाजप आमदार नितेश राणेंची महाविकास आघाडीवर टीकाImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 21, 2022 | 3:20 PM
Share

उस्मानाबादः आगामी निवडणुकांमध्ये MIM महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) येऊ शकते, असा प्रस्ताव खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी दिलाय, त्यावर भाजपने आघाडीतील तिन्ही पक्षांची चांगलीच खिल्ली उडवणं सुरु केलं आहे. यातच भाजप नेते नितेश राणे यांनी भलतेच वक्तव्य केले आहे. नितेश राणे (Nitesh Rane) हे आज सह कुटुंब तुळजापूरमधील भवानी मातेच्या दर्शनासाठी गेले आहेत. तेथे MIM च्या प्रस्तावावर प्रतिक्रिया त्यांची जीभ घसरली. MIM ने लग्नाचा प्रस्ताव तिघांना द्यावा, त्यांनी लग्न करावे, हनीमून करावे हा त्यांचा आपापसातला प्रश्न आहे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची यावर तिखट प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले नितेश राणे?

भाजप नेते नितेश राणे तुळजापूरमध्ये बोलताना म्हणाले, MIM ने तिघांना लग्नाचा प्रस्ताव दिला आहे. आता त्यांनी खुशाल लग्न करावे, हनीमून करावे. त्यांच्या घरात कोण कोणाबरोबर झोपतो, हा प्रश्न आमचा नाही. त्यांचा परस्परांमधला प्रश्न आहे. भाजप म्हणून आम्ही सरळ स्पष्ट आहोत. 2024 च्या निवडणुकीत भाजप स्वतःच्या ताकदीवर सत्ता आणतंय एवढं सरळ स्पष्ट आहे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं.

‘बाळासाहेबांवंतर देवेंद्र फडणवीस हिंदुहऋदय सम्राट’

MIM ने महाविकास आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर शिवसेनेने भगवा झेंडा सोडून हिरवा झेंडाही हाती घेऊ शकते, अशी टीका भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्वाचं स्वप्न देवेंद्र फडणवीस साकार करतील, असं वक्तव्यही नितेश राणे यांनी केलं. ते म्हणाले, ‘ महाविकास आघाडी नावाचे संकट 29 नोव्हेंबर 2019 पासून महाराष्ट्रावर आलंय ते संकट दूर करण्यासाठी भवानी मातेला साकडं घातलं आहे. संभाजीनगर आणि धाराशिव हे नामकरण करणे उध्दवजींच्या नशिबात नाही ते काम देवेंद्रजी करतील. बाळासाहेबांची सगळी स्वप्न भाजप यापुढे पूर्ण करेल. बाळासाहेबांनंतर महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस हेच हिंदुहृदयसम्राट आहेत., असं वक्तव्य नितेश राणे यांनी करत शिवसेनेला डिवचलं आहे.

‘दाऊद डोळा मारत नाही तोपर्यंत नवाबचा राजीनामा नाही’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने केली आहे. याविषयी बोलताना नितेश राणे म्हणाले, ‘ नवाब मलिकांचा राजीनामा अद्याप झालेला नाही. कारण दाऊदच्या आशीर्वादाने चालणारे सरकार आहे. जोपर्यंत दाऊद डोळा मारत नाही तोपर्यंत हे सरकार नवाबचा राजीनामा घेत नाही, अशा शब्दात महाविकास आघाडीवर खोचक टीका नितेश राणे यांनी केली आहे.

इतर बातम्या-

Photo Gallery | फैशन का है ये जलवा, दिलकश लगे ये जलवा, महकश लगे ये जलवा, नशा ही नशा ये जलवा…

Ferry Crash : ‘हे पाहणं खरंच खूप कठीण..’ भल्या मोठ्या जहाजाखाली आली छोटी नौका; अर्धा डझन ठार! पाहा, थरारक Video

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.