AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रयत क्रांती संघटना बीआरएससोबत जाणार काय?, संघटनेचे पांडुरंग शिंदे यांनी केली ही मागणी

मुठभर व्यापारी संघटित होऊन सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडतात. यामध्ये शेतकऱ्याची माती होते. सोयाबीन, कापूस, कांदा आणि फळे आणि भाजीपाल्याला गेल्या अनेक वर्षापासून कवडीमोल भाव मिळत आहे.

रयत क्रांती संघटना बीआरएससोबत जाणार काय?, संघटनेचे पांडुरंग शिंदे यांनी केली ही मागणी
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jun 09, 2023 | 5:50 PM
Share

राजीव गिरी, प्रतिनिधी, नांदेड : शेतकऱ्यांच्या हितासाठी रयत क्रांती संघटना ही भारत राष्ट्र समितीसोबत येणाऱ्या काळामध्ये जावे. युती करावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. नांदेडमध्ये शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या पक्षाच्या नेत्याकडे केलीय. रयत क्रांती संघटना ही शेतकरी नेते, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्याच्या हितासाठी कार्य करत आहे. भारत राष्ट्र समितीचे नेते तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे सुद्धा शेतकऱ्यांसाठी हितासाठी कार्य करतात. त्यांनी तेलंगना राज्यांमध्ये शेतकऱ्याच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत.

पांडुरंग शिंदे म्हणाले, भारत देश स्वतंत्र होऊन अमृत महोत्सव साजरा करत आहे. 75 वर्षाच्या कार्यक्रमांमध्ये राज्यपातळीवर तसेच देशपातळीवर सर्व पक्षाच्या नेतेमंडळीने सत्ता भोगलेली आहे. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, डावे , उजवे या सर्व पक्षांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. केंद्र सरकारचे आयात निर्यात धोरण निश्चित नाही. त्यामुळे शेतमालाचे भाव पाडले जात आहेत.

कांद्याला भाव मिळू लागला की निर्यात बंदी करायचे. गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्याचा सोयाबीन घरामध्ये पडून आहे. कारण केंद्र सरकारने खाद्यतेल मोठ्या प्रमाणात आयात केले आहे. कपासाची ही तीच परिस्थिती आहे. मुठभर व्यापारी संघटित होऊन सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडतात. यामध्ये शेतकऱ्याची माती होते. सोयाबीन, कापूस, कांदा आणि फळे आणि भाजीपाल्याला गेल्या अनेक वर्षापासून कवडीमोल भाव मिळत आहे.

राज्यामध्ये वाढत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही सरकारचं चुकीचं धोरण असल्यामुळे घडत आहे. आता या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी तेलंगणा राज्यामध्ये चांगले काम केलेले मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष हा म्हणतो आहे, आपकी बार किसान सरकार.

रयत क्रांती शेतकऱ्यांसाठी लढणारी संघटना

आज 75 वर्षानंतर पहिल्यांदा शेतकऱ्याचे सरकार यावं अशी घोषणा के. चंद्रशेखर राव करत आहेत. मी एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून त्याचे स्वागत करतो. आमचे नेते सदाभाऊ खोत यांना मी आवाहन करतोय आपली रयत क्रांती संघटना ही शेतकऱ्यांसाठी लढणारी लढाऊ संघटना आहे.

आपण येणाऱ्या काळामध्ये बीआरएस या पक्षासोबत जायला पाहिजे. ही मराठवाडा आणि विदर्भातील कार्यकर्त्यांची, शेतकऱ्याची भावना आहे. भाऊंनी आता भाजपाची संगत सोडून दिली. शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या पक्षासोबत काम करावे, अशी आम्ही मागणी करत आहोत.

ही मागणी वरिष्ठ नेत्यांकडे करणार

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये रयत क्रांती संघटनेची राज्यव्यापी कार्यकारिणी पुण्यामध्ये होणार आहे. कार्यकारिणीमध्ये आम्ही ही मागणी भाऊकडे आणि वरिष्ठ नेत्यांकडे करणार आहोत. भाऊंनी या आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा. येणाऱ्या निवडणुका बीआरएससोबत लढवाव्यात.

यावेळी पत्रकार परिषद रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद वंजारे, रयत क्रांती पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम वडजे, राहुल ढगे, विशाल सरोदे, राजू हनुमंत, साहेबराव सोनकांबळे, मनोज नागठाणकर उपस्थित होते.

Follow Us
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर