AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसचे महाराष्ट्रात एकला चलो रे?, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर म्हणतात,…

संजय राऊत आणि शरद पवार यांना मारण्याची धमकी आली आहे. शासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी. सत्ता येते आणि जाते. यामध्ये सामान्य माणूस आणि नेता यांची दक्षता घेणे हे शासनाचे काम आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्रात एकला चलो रे?, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर म्हणतात,...
| Updated on: Jun 09, 2023 | 4:56 PM
Share

प्रतिनिधी, जळगाव : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रात एकला चलो रेची हाक दिली आहे. ही दिलेली हाक खरी की? राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचे खरं. असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी पाटण्यात नितीश कुमार यांनी बोलावलेल्या बैठकीला हजर राहणार आहेत, असं वक्तव्य केलं. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात की, आम्ही महाराष्ट्रात स्वबळावर लढू. नेमकं खरं कोणाचं मानायचं. हे काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी सांगतील का ? असा सवाल ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्याबाबतच्या चर्चेवर ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली.

प्रकाश आंबेडकर यांचा माध्यमांवरही आरोप

मुंबईतील घटनेप्रमाणे दिल्ली आणि पालघर मध्येही भयावह घटना घडल्या. मात्र या घटनेत देशपांडे, भिडे नाव आलेत. त्यामुळे त्या नावांचा उल्लेखही केला गेला नाही. पण अल्ताफ, हुसेन ही नावे आली, तर लगेच बाहेर पडतात. सर्व प्रसार माध्यम हे मुस्लिम द्वेषी असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

औरंगजेबाच्या फोटोचा इश्यू का केला जातोय?

औरंगजेब या मातीतला आहे. औरंगजेबाचे फोटो लावले किंवा छापले तर काय फरक पडतो. असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना उपस्थित केला आहे. औरंगजेब कुठून पैदा झाला, हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं. औरंगजेबाच्या फोटोचा इश्यू का केला जातोय, असं थेट सवाल प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना उपस्थित केला आहे.

ही जबाबदारी पोलीस खात्याची

संजय राऊत आणि शरद पवार यांना मारण्याची धमकी आली आहे. शासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी. सत्ता येते आणि जाते. यामध्ये सामान्य माणूस आणि नेता यांची दक्षता घेणे हे शासनाचे काम आहे. हे काम शासन करेल, असं मला वाटते, असंही मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. पोलिसांनी या दोन्ही नेत्यांना सुरक्षितता दिली पाहिजे. राजकीय नेते काय सांगतात. यापेक्षा पोलीस खात्याकडे संरक्षणाची जबाबदारी आहे. त्यांनी ती पार पाडावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Follow Us
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....