AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amol Mitkari | राज ठाकरे दंगली भडकवण्याचे काम करतात, आमदार अमोल मिटकरी यांची टीका

हिंदू, मुस्लिम यांना शिक्षणाचे, बेरोजगारीचे दरवाढीचा प्रश्न महत्वाचे आहे. दंगली भडकल्या तर गृह विभागाने लक्ष दिले पाहिजे की, चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई केली पाहिजे, असेही आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

Amol Mitkari | राज ठाकरे दंगली भडकवण्याचे काम करतात, आमदार अमोल मिटकरी यांची टीका
मनसेचे राज ठाकरे, अमोल मिटकरी.Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Apr 17, 2022 | 1:48 PM
Share

अकोला : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत घेतली. भोंगे वाजविल्यामुळं लोकांना त्रास होतो. त्यांनी दगडफेक केली तर आमचे हात काही बांधलेले नाहीत, असं विधान राज ठाकरे यांनी केलं. यावर प्रतिक्रिया देताना अकोल्यात अमोल मिटकरी म्हणाले, राज ठाकरे यांनी हे दंगली भडविण्याचे काम करीत आहे. समान नागरिक कायदा अपेक्षित होता. हा कायदा नेमका कशासाठी खातात, हे तरी त्यांनी वाचून घ्यावे. प्रसिद्धीसाठी पोकळ घोषणा करता. यातून हाती काहीच लागणार नाही. तुम्ही संभाजी नगरलाजा, अयोध्येला (Ayodhya) जा, श्रीरामाचे दर्शन घेताना आत्मीयेतेने दर्शन घ्या. चेहऱ्यावर सात्विक भाव येऊ द्या. हनुमान चालीसाच्या दोन ओळी तुम्हाला म्हणता येत नाही, असा खोचक टोला आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज ठाकरे यांना आज मारला.

उदरनिर्वाहाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत

राज ठाकरे यांनी केलेल्या व्यक्तव्याचा अमोल मिटकरी यांनी चांगला समाचार घेतला. पुढे ते म्हणाले, दोन वर्षांपासून राज्यावर आर्थिक संकट आहे. आता कुठे राज्य आर्थिक संकटातून बाहेर पडत आहे. सर्वसामान्य हिंदू असेल, सर्वसामान्य मुस्लिम असले त्यांचे रोजंदारीचे उदरनिर्वाहचे प्रश्न आहेत. भोंगे वाटणे, हातात तलवारी घेणे, तलवारी वाटणे हे आमचे प्रश्न नाहीत. राज्याला फुले, शाहू आंबेडकर यांची परंपरा आहे. देशाला बाबासाहेब यांनी संविधान दिले आहे.

चिथावणीखोरांवर कारवाई करावी

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचून काही लोकांना वाटत असेल तर काही लोकांना वाटत असेल तर मस्जिद वरील भोंगे उतरवा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल परत एकदा वाचावा. रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत कोणत्याही धार्मिक स्थळावर भोंगे वाजता कामा नाही, असा निकाल आहे. असा प्रकारच्या वलग्ना करायच्या. त्यांनी तलवारी काढल्या तर आम्ही तलवारी काढू. काल महाराष्ट्राने तुमचे मनसुबे उधळले आहेत. अनेक ठिकाणी मुस्लिमांनी हनुमान चालीसा वाचली. कायद्याचे राज्य आहे. कायद्याने राज्य चालते. हिंदू, मुस्लिम यांना शिक्षणाचे, बेरोजगारीचे दरवाढीचा प्रश्न महत्वाचे आहे. दंगली भडकल्या तर गृह विभागाने लक्ष दिले पाहिजे की, चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या वर कारवाई केली पाहिजे, असेही आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

Amravati Shiv Sainik | अमरावतीत हनुमान चालीसावरून वातावरण तापलं, शिवसैनिक धडकले रवी राणा यांच्या घरासमोर, शिवसैनिक ताब्यात 

Buldana ST | बुलडाण्यातील एसटीची महिन्याला 45 लाखांची बचत; 450 बसपैकी 150 बस सुरू, बचतीचे कारण काय?

Nagpur Crime | रामटेकमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मुलीच्या आईने आरोपीस चपलेने बदडले

Follow Us
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.