औरंगजेबाच्या मुद्द्यावरून वार पलटवार, संभाजीराजे यांची प्रकाश आंबेडकर यांच्यावर सडकून टीका; म्हणाले, औरंगजेब हा…

माझी खासदारांना सूचना आहे की, त्यांनी किसान रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वेमंत्र्यांकडे आग्रह धरावा. 37 देशात सांगोल्यातील डाळिंब जाते. मात्र किसान रेल्वे बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

औरंगजेबाच्या मुद्द्यावरून वार पलटवार, संभाजीराजे यांची प्रकाश आंबेडकर यांच्यावर सडकून टीका; म्हणाले, औरंगजेब हा...
prakash ambedkar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 7:59 AM

सोलापूर | 7 ऑगस्ट 2023 : औरंगजेब देवेंद्र फडणवीस यांचा हिरो होऊ शकत नाही, पण देशाचा हिरो होऊ शकतो, असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यावरून प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीकाही होत आहे. आता या वादात स्वराज्य पक्षाचे नेते आणि माजी खासदार संभाजीराजे यांनी उडी घेतली आहे. संभाजीराजे यांनी याप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे.

संभाजीराजे सोलापुरात आले होते. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर नाव न घेता टीका केली. औरंगजेब हा देशात कोणत्याही समाजाचा किंवा व्यक्तीचा आदर्श होऊ शकत नाही. जे कोणी असं बोलत असतील ते साफ चुकीचे आहे, असं म्हणत संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर पलटवार केला आहे.

हे सुद्धा वाचा

किसान रेल्वे सुरू करा

यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यातील समस्यांवरही भाष्य केलं. माझी खासदारांना सूचना आहे की, त्यांनी किसान रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वेमंत्र्यांकडे आग्रह धरावा. 37 देशात सांगोल्यातील डाळिंब जाते. मात्र किसान रेल्वे बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मी सांगोल्यात सर्व ठिकाणी फिरलो. आता येथे पाण्याचे दुर्भिक्ष आहे. येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्याचं साम्राज्य आहे. इथे रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र अतिशय निकृष्ट दर्जाचे रस्ते होत आहेत. त्याचे पुरावे मी स्वतः देईन, असं संभाजीराजे म्हणाले.

गुवाहाटीबद्दल बोलणार नाही

स्वराज्य पक्ष 2024 ला वेगळा पर्याय म्हणून उभा राहील, असा दावाही त्यांनी केला. मी कोणावर वैयक्तिक टीका करणार नाही. गुवाहाटीबद्दल काही बोलणार नाही. गेल्या 75 वर्षात महाराष्ट्रातील राजकारण एवढ्या खालच्या पातळीला कधीच गेले नव्हते, असंही त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी-भाजपवर टीका

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची खिल्ली उडवली. राष्ट्रवादी म्हणायची आम्ही पुरोगामी विचाराचे लोक आहोत. जातीयवादी पक्षांसोबत जाणार नाही. तर भाजपचे नेते म्हणायचे, नाही नाही नाही.. आम्ही राष्ट्रवादी सोबत कदापिही युती करणार नाही. वर केंद्रात मोठमोठी भाषणं करतात. मात्र राज्यातही तेच बोलतात. चक्की पिसिंग पिसिंग.

त्यांच्या आमदारांनी सर्वात जास्त टीका पवार कुटुंबावर केली. अजितदादा, शरद पवार यांच्यावर टीका केली. आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसावे लागत आहे. निधी मिळत नाही म्हणून हे सत्तेबाहेर पडले. आता त्याच नेत्याकडे अर्थ खात गेले, अशा शब्दात संभाजीराजे यांनी भाजप आणि राष्ट्रवादीची खिल्ली उडवली.

Non Stop LIVE Update
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.