AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनात हृषिकेशची पत्नी गेली, तर सुमित्रानं पतीला गमावलं! मुलांच्या भविष्यासाठी सुमित्रा-हृषिकेशची लग्नगाठ

कोरोनाने हृषिकेशची पत्नी गेली, तर सुमित्रानं पतीला गमावलं. अश्या परिस्थितीत मुलांच्या भविष्यासाठी सुमित्रा-हृषिकेशची लग्नगाठ बांधली

कोरोनात हृषिकेशची पत्नी गेली, तर सुमित्रानं पतीला गमावलं! मुलांच्या भविष्यासाठी सुमित्रा-हृषिकेशची लग्नगाठ
| Edited By: | Updated on: May 31, 2022 | 11:16 AM
Share

मुंबई : कोरोनाने (Corona) आपल्या जवळच्या लोकांना हिरावून घेतलं. त्यामुळे अनेकांचा आधार हरपला. अश्यात जर आपल्या पती किंवा पत्नीला गमावलं तर आपल्या जगण्याचा आधार जातो. एकटेपण येतं. पण अश्यात कुटुंब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं असेल तर या एकाकीपणावर सहज मात करू शकता. असाच काहीसा अनुभव हृषिकेश आणि सुमित्राला (Sumitra Hrishikesh Marriage) आला. घरातील मंडळींच्या साथीमुळे त्यांनी लग्नगाठ बांधली. परंपराना मोडीत काढत हा विवाह पार पडला. दोघांनी मुलांसह एकमेकांना स्विकारलं. दोन्ही कुटुंबाच्या संमतीने 27 मेला हा विवाह पार पडला.

कोरोनाने हृषिकेशची पत्नी गेली, तर सुमित्रानं पतीला गमावलं. अश्या परिस्थितीत मुलांच्या भविष्यासाठी सुमित्रा-हृषिकेशची लग्नगाठ बांधली. रूढी, परंपरा बाजूला सारत लोक काय म्हणतील, याचा विचारही न करता त्यांनी आपल्या मुलांसाठी आणि स्वत:साठी मोठा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याला सुखाची पालवी फुटलीय. काहीही झालं तरी प्रत्येकाला आनंदी आयुष्य जगण्याचा अधिकार आहे, असं म्हणत त्यांनी सप्तपदी घेतली.

सुमित्रा यांनी आपल्या पतीला गमावलं तर ऋषीकेश यांची पत्नी कोरोनाने हिरावून घेतली. या दोघांनाही मुलं आहेत. आपला जोडीदार गमावल्यानंतर त्यांनी आपल्या जीवनात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. तसंच मुलांचही भविष्य घडावं यासाठी ते एकत्र आलेत.

शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे गावच्या सुमित्रा यांचे पती विनोद पाटील यांचं कोरोनामुळे निधन झालं. त्यानंतर त्या कोसळल्या त्यांच्यासोबत पाच वर्षांच्या मुलीच्या डोक्यावरचं पित्याचं छत्र हरपलं. तर भडगाव तालुक्यातील कनाशी गावच्या ऋषीकेश यांच्या पत्नी अनघा यांचंही कोरोनामुळे निधन झालं. त्या शिक्षिका होत्या. ऋषीकेश यांनाही 22 वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्याशी सुमित्रा यांचे दीर नितीन पाटील यांनी संपर्क केला.मग सुमित्रा यांचे दीर नितीन पाटील यांनी पुढाकार घेत त्यांचं दुसरं लग्न लावून दिलं. सुमित्रा यांची दुसरं लग्न करण्याची इच्छा इच्छा नव्हती. पण त्यांच्या दीराच्या पुढाकाराने हे लग्न पार पडलं.

Follow Us
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.