कोरोनात हृषिकेशची पत्नी गेली, तर सुमित्रानं पतीला गमावलं! मुलांच्या भविष्यासाठी सुमित्रा-हृषिकेशची लग्नगाठ

कोरोनाने हृषिकेशची पत्नी गेली, तर सुमित्रानं पतीला गमावलं. अश्या परिस्थितीत मुलांच्या भविष्यासाठी सुमित्रा-हृषिकेशची लग्नगाठ बांधली

कोरोनात हृषिकेशची पत्नी गेली, तर सुमित्रानं पतीला गमावलं! मुलांच्या भविष्यासाठी सुमित्रा-हृषिकेशची लग्नगाठ
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 11:16 AM

मुंबई : कोरोनाने (Corona) आपल्या जवळच्या लोकांना हिरावून घेतलं. त्यामुळे अनेकांचा आधार हरपला. अश्यात जर आपल्या पती किंवा पत्नीला गमावलं तर आपल्या जगण्याचा आधार जातो. एकटेपण येतं. पण अश्यात कुटुंब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं असेल तर या एकाकीपणावर सहज मात करू शकता. असाच काहीसा अनुभव हृषिकेश आणि सुमित्राला (Sumitra Hrishikesh Marriage) आला. घरातील मंडळींच्या साथीमुळे त्यांनी लग्नगाठ बांधली. परंपराना मोडीत काढत हा विवाह पार पडला. दोघांनी मुलांसह एकमेकांना स्विकारलं. दोन्ही कुटुंबाच्या संमतीने 27 मेला हा विवाह पार पडला.

कोरोनाने हृषिकेशची पत्नी गेली, तर सुमित्रानं पतीला गमावलं. अश्या परिस्थितीत मुलांच्या भविष्यासाठी सुमित्रा-हृषिकेशची लग्नगाठ बांधली. रूढी, परंपरा बाजूला सारत लोक काय म्हणतील, याचा विचारही न करता त्यांनी आपल्या मुलांसाठी आणि स्वत:साठी मोठा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याला सुखाची पालवी फुटलीय. काहीही झालं तरी प्रत्येकाला आनंदी आयुष्य जगण्याचा अधिकार आहे, असं म्हणत त्यांनी सप्तपदी घेतली.

सुमित्रा यांनी आपल्या पतीला गमावलं तर ऋषीकेश यांची पत्नी कोरोनाने हिरावून घेतली. या दोघांनाही मुलं आहेत. आपला जोडीदार गमावल्यानंतर त्यांनी आपल्या जीवनात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. तसंच मुलांचही भविष्य घडावं यासाठी ते एकत्र आलेत.

हे सुद्धा वाचा

शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे गावच्या सुमित्रा यांचे पती विनोद पाटील यांचं कोरोनामुळे निधन झालं. त्यानंतर त्या कोसळल्या त्यांच्यासोबत पाच वर्षांच्या मुलीच्या डोक्यावरचं पित्याचं छत्र हरपलं. तर भडगाव तालुक्यातील कनाशी गावच्या ऋषीकेश यांच्या पत्नी अनघा यांचंही कोरोनामुळे निधन झालं. त्या शिक्षिका होत्या. ऋषीकेश यांनाही 22 वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्याशी सुमित्रा यांचे दीर नितीन पाटील यांनी संपर्क केला.मग सुमित्रा यांचे दीर नितीन पाटील यांनी पुढाकार घेत त्यांचं दुसरं लग्न लावून दिलं. सुमित्रा यांची दुसरं लग्न करण्याची इच्छा इच्छा नव्हती. पण त्यांच्या दीराच्या पुढाकाराने हे लग्न पार पडलं.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.