AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nandurbar | पुराच्या पाण्यात स्मशानभूमीतील मृतदेह वाहून गेल्याचा ग्रामस्थांचा दावा, प्रशासनाने घेतली घटनास्थळी धाव, वाचा नेमके प्रकरण काय?

पावसामुळे नंदुरबार तालुक्यातील वाघशेप येथील शिवण नदीला मोठा पूर आला होता. पुराचे पाणी थेट स्मशानभूमीत शिरल्याने दोन ते तीन मृतदेह वाहून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीयं. दोन ते तीन मृतदेह पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचा दावा वाघशेप येथील ग्रामस्थांनी केलायं.

Nandurbar | पुराच्या पाण्यात स्मशानभूमीतील मृतदेह वाहून गेल्याचा ग्रामस्थांचा दावा, प्रशासनाने घेतली घटनास्थळी धाव, वाचा नेमके प्रकरण काय?
| Edited By: | Updated on: Aug 18, 2022 | 2:50 PM
Share

नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्हात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरूयं. यामुळे जिल्हातील धरणे ओव्हर फ्लो झाली असून अनेक नद्यांना पूर देखील आलायं. मात्र, यापावसामुळे पिकांचे मोठे नुकसान (Damage) झाले असून रस्त्यांचे देखील तीन तेरा वाजले आहेत. नंदुरबार जिल्हात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. नंदुरबार तालुक्यातील वाघशेपा येथून एक धक्कादायक (Shocking) घटना पुढे येते आहे. नंदुरबार तालुक्यातील वाघशेपा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या स्मशानभूमीत शिवण नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने दोन ते तीन मृतदेह पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलायं.

वाघशेप येथील शिवण नदीला मोठा पूर आल्याने पुराचे पाणी थेट स्मशानभूमीत

पावसामुळे नंदुरबार तालुक्यातील वाघशेप येथील शिवण नदीला मोठा पूर आला होता. पुराचे पाणी थेट स्मशानभूमीत शिरल्याने दोन ते तीन मृतदेह वाहून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीयं. दोन ते तीन मृतदेह पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचा दावा वाघशेप येथील ग्रामस्थांनी केलायं. गेल्या तीन ते चार दिवसांपासुन जिल्ह्यात पावसाच्या संततधार सुरू आहे. यामुळे नदीला मोठा पूर आलायं.

स्मशानभूमीत पाणी शिरल्याने पाण्याच्या प्रवाहात मृतदेह वाहून गेल्याचा दावा

नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात पाणीसाठा वाढल्याने पाणी शिवण नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे शिवण नदीला पूर आल्याने वाघशेपा गावाच्या स्मशानभूमीत पाणी शिरले. वाघशेपा गावाची स्मशानभुमी ही नदीला लागूनच आहे. 14 ऑगस्ट रोजी स्मशानभूमीत पाणी शिरल्याने पाण्याच्या या प्रवाहात पुरलेले अनेक मृतदेह हे बाहेर आले असुन यातील दोन ते तीन मृतदेह वाहुन गेल्याचा दावा ग्रामस्थांकडुन केल्या जात आहे. याबाबत प्रशासनाने देखील पडताळणीसाठी एक पथक घटनास्थळी पाठवल्याची माहिती मिळते आहे.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....