AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nandurbar | पुराच्या पाण्यात स्मशानभूमीतील मृतदेह वाहून गेल्याचा ग्रामस्थांचा दावा, प्रशासनाने घेतली घटनास्थळी धाव, वाचा नेमके प्रकरण काय?

पावसामुळे नंदुरबार तालुक्यातील वाघशेप येथील शिवण नदीला मोठा पूर आला होता. पुराचे पाणी थेट स्मशानभूमीत शिरल्याने दोन ते तीन मृतदेह वाहून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीयं. दोन ते तीन मृतदेह पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचा दावा वाघशेप येथील ग्रामस्थांनी केलायं.

Nandurbar | पुराच्या पाण्यात स्मशानभूमीतील मृतदेह वाहून गेल्याचा ग्रामस्थांचा दावा, प्रशासनाने घेतली घटनास्थळी धाव, वाचा नेमके प्रकरण काय?
| Edited By: | Updated on: Aug 18, 2022 | 2:50 PM
Share

नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्हात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरूयं. यामुळे जिल्हातील धरणे ओव्हर फ्लो झाली असून अनेक नद्यांना पूर देखील आलायं. मात्र, यापावसामुळे पिकांचे मोठे नुकसान (Damage) झाले असून रस्त्यांचे देखील तीन तेरा वाजले आहेत. नंदुरबार जिल्हात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. नंदुरबार तालुक्यातील वाघशेपा येथून एक धक्कादायक (Shocking) घटना पुढे येते आहे. नंदुरबार तालुक्यातील वाघशेपा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या स्मशानभूमीत शिवण नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने दोन ते तीन मृतदेह पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलायं.

वाघशेप येथील शिवण नदीला मोठा पूर आल्याने पुराचे पाणी थेट स्मशानभूमीत

पावसामुळे नंदुरबार तालुक्यातील वाघशेप येथील शिवण नदीला मोठा पूर आला होता. पुराचे पाणी थेट स्मशानभूमीत शिरल्याने दोन ते तीन मृतदेह वाहून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीयं. दोन ते तीन मृतदेह पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचा दावा वाघशेप येथील ग्रामस्थांनी केलायं. गेल्या तीन ते चार दिवसांपासुन जिल्ह्यात पावसाच्या संततधार सुरू आहे. यामुळे नदीला मोठा पूर आलायं.

स्मशानभूमीत पाणी शिरल्याने पाण्याच्या प्रवाहात मृतदेह वाहून गेल्याचा दावा

नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात पाणीसाठा वाढल्याने पाणी शिवण नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे शिवण नदीला पूर आल्याने वाघशेपा गावाच्या स्मशानभूमीत पाणी शिरले. वाघशेपा गावाची स्मशानभुमी ही नदीला लागूनच आहे. 14 ऑगस्ट रोजी स्मशानभूमीत पाणी शिरल्याने पाण्याच्या या प्रवाहात पुरलेले अनेक मृतदेह हे बाहेर आले असुन यातील दोन ते तीन मृतदेह वाहुन गेल्याचा दावा ग्रामस्थांकडुन केल्या जात आहे. याबाबत प्रशासनाने देखील पडताळणीसाठी एक पथक घटनास्थळी पाठवल्याची माहिती मिळते आहे.

तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....