AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nandurbar | नंदुरबारकरांवर पाणीकपातीचे संकट, दोन दिवसाआड पाणीपुरवठा होणार…

शहरातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आव्हान मनपा प्रशासनाकडून करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 38 मिलिमीटर पाऊस झाल्याची शासकीय नोंद आहे. 59 मि.मी अक्कलकुवा, 42 मि.मी शहादा, 38 मि.मी नंदुरबार, 21 मि.मी नवापूर, 16 मि.मी धडगाव, 14 मि.मी तळोदा नंदुबार शहराला पाणीपुरवठा करणारे विरचक धरणांमध्ये अवघ्या 18 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

Nandurbar | नंदुरबारकरांवर पाणीकपातीचे संकट, दोन दिवसाआड पाणीपुरवठा होणार...
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 28, 2022 | 8:35 AM
Share

मुंबई : नंदुरबार (Nandurbar) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील पाणीसाठा कमी झालायं. यामुळे मनपा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून आजपासून शहरामध्ये दोन दिवस आड करून पाणीपुरवठा केला जाणार आहे. पावसाळा सुरू होऊन जवळजवळ महिना उलटत आला आहे. मात्र, पाहिजे तसा पाऊस (Rain) न झाल्याने आता नंदुरबारकरांना पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. नंदुरबार शहरासोबतच जिल्ह्यात देखील पाणीकपातीचे संकट आहे. जिल्ह्यातील चार मध्यम आणि 12 लघु प्रकल्पही ठणठणाट झाले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जोपर्यंत धरणातील पाणीसाठा वाढत नाही तोपर्यंत दोन दिवसाआड पाणीपुरवठा (Water supply) केला जाणार असल्याचे मनपा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

मनपा प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन

शहरातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आव्हान मनपा प्रशासनाकडून करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 38 मिलिमीटर पाऊस झाल्याची शासकीय नोंद आहे. 59 मि.मी अक्कलकुवा, 42 मि.मी शहादा, 38 मि.मी नंदुरबार, 21 मि.मी नवापूर, 16 मि.मी धडगाव, 14 मि.मी तळोदा नंदुबार शहराला पाणीपुरवठा करणारे विरचक धरणांमध्ये अवघ्या 18 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील पेरणी देखील खोळंबली आहे ृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेला आहे की 75 ते 100 मिलिमीटर पर्यंत पाऊस होत नाही तोपर्यंत कुठलाही शेतकर्‍यांनी पेरणी करू नये.

महिना उलटूनही 75 ते 100 मिलिमीटर पाऊस नाही

जवळपास महिना उलटून गेला असला तरी देखील 75 ते 100 मिलिमीटर पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे. त्यामुळे मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे. राज्यामधील अनेक शहरांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावलीयं. मात्र, नंदुरबार जिल्हाकडे यंदा पावसाने पाठ फिरवल्याचे दिसते आहे. मान्सून राज्यात दाखल होऊन जवळपास महिना झाला आहे, इतर जिल्हातील शेतकऱ्यांनी पेरणी करून घेतलीयं. मात्र, पाऊस कमी असल्याने नंदुरबार जिल्हातील शेतकऱ्यांना अद्याप पेरणी करता आली नाहीये.

Follow Us
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके