AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parambir singh : परमबीर सिंहांनी निलंबन धुडकावलं, ठाकरे सरकारविरोधात कोर्टात जाणार

निलंबन बेकायदेशीर असल्याचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. ठाकरे सरकारे सरकारने केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात परमबीर सिंह कोर्टातही जाणार आहेत.

Parambir singh : परमबीर सिंहांनी  निलंबन धुडकावलं,  ठाकरे सरकारविरोधात कोर्टात जाणार
परमबीर सिंह, अनिल देशमुख
| Edited By: | Updated on: Dec 03, 2021 | 3:38 PM
Share

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सध्या चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत, खडणीसारख्या गंभीर आरोपात परमबीर सिंह यांच्या चौकशी सुरू आहेत. त्यावरून सुरूवातीला त्यांचं निलंबनही करण्यात आलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे परमबीर सिंह नंतर स्वत: अडचणीत सापडले. परमबीर सिंह यांच्यावरही नंतर अनेक गंभीर आरोप झाले, त्यानंतर परबीर सिंह काही काळ फरार झाल्याचं दिसून आलं. मात्र सुप्रीम कोर्टानं अटकेपासून दिलासा दिल्यानंतर परमबीर सिंह पुन्हा मुंबईत आले.

ठाकरे सरकारविरोधात कोर्टात जाणार

सचिन वाझेचं प्रकरण बाहेर आल्यानंतर परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या.आधी त्यांची तातडीने बदली करण्यात आली आणि नंतर खंडणी, अधिकाऱ्यांना जातिवाचक शिवीगाळ, बुकींकडे पैसे मागितल्याचे आरोप झाल्यानंतर परमबीर सिंह यांचं निलंबन करण्यात आलं. मात्र हे निलंबन बेकायदेशीर असल्याचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. ठाकरे सरकारे सरकारने केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात परमबीर सिंह कोर्टातही जाणार आहेत.

परमबीर सिंह विरुद्ध राज्य सरकार

गेल्या काही दिवसांपासून सतत परमबीर सिंह विरुद्ध राज्य सरकार संघर्ष पहायला मिळत आहे. सचिन वाझे प्रकरणानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांची तात्काळ बदली करत मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी हेमंत नागराळे यांची नियुक्ती केली. त्यानंतर परमबीर सिंहांनी अनिल देशमुखांनी वाझेला खंडणीचं टार्गेट दिल्याचे आरोप केले आणि अनिल देशमुखांविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना हायकोर्टाचा रस्ता दाखवला. मुंबई हायकोर्टात आल्यानंतर या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यानंतर अनिल देशमुखांनी राजीनामा दिला आणि देशमुखांच्या अडचणी वाढल्या. मात्र त्यानंतर परमबीर सिंह यांच्यावरही खंडणी मागितल्याचे गंभीर आरोप झाले. आणि परमबीर सिंह यांचं निलंबन करण्यात आलं. आता तेच निलंबन बेकायदेशीर असल्याचा दावा माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. त्यामुळे आता कोर्टात धाव घेतल्यावर परमबीर सिंह यांना दिलासा मिळणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Redmi Note 10S चं नवीन स्टोरेज व्हेरिएंट भारतात लाँच, किंमत…

Weather Update : आता उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी, पाऊस अन् वातावरणातही निर्माण होणार गारवा

हिंगोली नगर पालिकेचा नवा फंडा, लस घेणाऱ्यांना लकी ड्रॉ द्वारे बक्षीसं! टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनही जिंकण्याची संधी!

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.