AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Power Cut : मुंबईत अनेक भागांतील वीज गुल; मुसळधार पावसाचा जोर कमी होईना

यंदाच्या हंगामात मुंबई शहर व उपनगरांत पहिल्यांदाच रेकॉर्डब्रेक पावसाचे धुमशान सुरू आहे. या पावसाने रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा खोळंबा केला असतानाच आता अनेक भागांतील वीजेच्या पुरवठ्यावरही परिणाम होऊ लागला आहे. गुरुवारी रात्री मुसळधार पावसामुळे दादर, शिवाजी पार्क, अँटॉप हिल आणि सायनमधील भागांसह शहराच्या अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला.

Mumbai Power Cut : मुंबईत अनेक भागांतील वीज गुल; मुसळधार पावसाचा जोर कमी होईना
सांगली जिल्ह्यात 5 लाख 50 हजारांची वीजचोरी उघडImage Credit source: TV9
| Updated on: Jul 01, 2022 | 7:40 PM
Share

मुंबई : मुंबई शहर व उपनगरांत शुक्रवारी सलग दुसर्‍या दिवशी मुसळधार पावसाचे थैमान सुरू राहिले आहे. या मुसळधार पावसा (Heavy Rain)ने मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत केले असून शहर व उपनगरांतील अनेक भागांत विजपुरवठा (Power Supply)ही खंडित झाला आहे. आधीच बाहेर पावसामुळे दिवसाही अंधाराचे साम्राज्य आहे. त्यात घरातील वीज गुल झाली आहे. त्यामुळे बर्‍याच भागांतील मुंबईकरांची प्रचंड गैरसोय झाली आहे. अँटॉप हिल आणि सायन येथील काही इमारतींमध्ये रात्रभर वीज खंडित (Power Outage) झाला. परिणामी, अनेक रहिवाशांची, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. पावसाने हवेत गारवा आणला असला तरी आर्द्रतेचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे वीजेअभावी उकाड्यानेही नागरिक हैराण झाले. त्याचबरोबर अनेक छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यांवरही खंडित वीजपुरवठ्याचा मोठा परिणाम झाला आहे. व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

मुसळधार पावसामुळे बत्ती गुल

कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीलगतच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यंदाच्या हंगामात मुंबई शहर व उपनगरांत पहिल्यांदाच रेकॉर्डब्रेक पावसाचे धुमशान सुरू आहे. या पावसाने रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा खोळंबा केला असतानाच आता अनेक भागांतील वीजेच्या पुरवठ्यावरही परिणाम होऊ लागला आहे. गुरुवारी रात्री मुसळधार पावसामुळे दादर, शिवाजी पार्क, अँटॉप हिल आणि सायनमधील भागांसह शहराच्या अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. रात्रीच्या वेळी घरात पंखा किंवा लाईट नसल्यामुळे मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. अनेक इमारतींच्या लिफ्टही वीजेअभावी बंद झाल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोईंचा सामना करावा लागला. पावसाळ्यात केबल्स तुटतात. त्यामुळे अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो, असे बेस्टच्या अधिकार्‍यांनी सांगितले. दुसरीकडे पूर्व उपनगरात घाटकोपर, मुलुंड, विक्रोळी आणि अंबरनाथसारख्या काही दूरच्या उपनगरांसह शहरातील इतर भागांमध्येही वीजपुरवठा खंडित झाला. (Power outages in many parts of Mumbai due to heavy rains)

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.