28 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली, हे सरकार संवेदनाहीन अन् गेंड्याच्या कातडीचं, प्रविण दरेकरांचा घणाघात
एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या तसेच त्यांच्या इतर अडचणींच्या मुद्द्याला घेऊन भाजप महाविकास आघाडीला लक्ष्य करत आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीदेखील सरकार गेंड्याच्या कातडीचं असल्याचं म्हणत राज्य परिवहन महामंडळाचे एमडी यांच्या कार्यालयाला टाळे लावण्यात येईल असा इशारा दिला.
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या तसेच त्यांच्या इतर अडचणींच्या मुद्द्याला घेऊन भाजप महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करत आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीदेखील सरकार गेंड्याच्या कातडीचं असल्याचं म्हणत राज्य परिवहन महामंडळाचे एमडी यांच्या कार्यालयाला टाळे लावण्यात येईल असा इशारा दिला. ते मुंबईत बोलत होते.
सरकार गेंड्याच्या कातडीचं, संवेदनाहीन
अहमदनगरला शेवगाव येथील एसटी चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शुक्रवारी (29 ऑक्टोबर) सकाळी ही घटना घडली होती. तसेच मालेगावात एसटी चालकाच्या मुलानं आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला. संबंधित मुलावर मालेगावात खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षवेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली. “सरकार गेंड्याच्या कातडीचं संवेदनाहीन आहे. 28 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात कामावर आले नाही तर कारवाई करू, असं एसटीच्या एमडीने पत्रक काढले आहे. हे जुलमी पत्र असून वेळ पडली तर एमडीच्या कार्यालयाला टाळे लावू. अशा वेळी मी स्वत: उपस्थित असेल,” असे प्रविण दरेकर म्हणाले.
साखर आयुक्तांनी काढलेलं पत्रक अन्यायकारक
शेतकऱ्यांकडून वीजबील वसूल करण्यासाठी साखर आयुक्तांनी अजब आदेश दिला आहे. या आदेशात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपीमधून वीजबिलं वसूल करण्यात यावीत असे निर्देश देण्यात आले आहेत. आयुक्तांच्या या आदेशावरदेखील दरेकर यांनी आक्षेप नोंदवला आहे. साखर आयुक्तांनी जे पत्रक काढले ते अन्यायकारक आहे. अशा पद्धतीने त्यांना वसुली करता येणार नाही. जुलमी पद्धतीने वसुली करू नये. त्याचा जाब आम्ही सरकारला विचारु, असं दरेकर यांनी म्हटलंय.
पण ते वेळोवेळी तोंडावर पडले
तसेच पुढे बोलताना त्यांनी शिवसेना तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली. हे आम्ही राष्ट्रीय स्तरावर निवडणुका लढू म्हणतात. पण वेळोवेळी ते तोंडावर पडले. उद्धव टाकरे यांच्यासाठी राऊत यांना बोलावं लागतं, अशी टीका दरेकर यांनी केली.
इतर बातम्या :
समीर वानखेडेंनी धर्मांतर केल्याचं दिसत नाही, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या उपाध्यक्षांचं मोठं विधान
मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएमकडून तिरंगा रॅलीची घोषणा, तर वंचितसोबत आघाडीचे ओवेसींचे संकेत!
‘रस्की वेड्स आदि’, ‘शनाया’ फेम अभिनेत्री रसिका सुनीलने गुपचूप बांधली लग्नगाठ!#RasikaSunil | #AdityaBilagi | #Wedding | #Entertainment https://t.co/urU2eR3xRC
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 30, 2021