AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Jain Boarding: ‘मुरलीधर मोहोळ यांच्यावर विश्वास नाही’, जैन मुनींनी घेतला सर्वात मोठा निर्णय

Murlidhar Mohol: पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीचे कथित गैरव्यवहार प्रकरण चांगलेच तापले आहे. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर याप्रकरणी गंभीर आरोप होत आहेत.आता जैनमुनींनी याबाबत आक्रमक भूमिका घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Pune Jain Boarding: 'मुरलीधर मोहोळ यांच्यावर विश्वास नाही', जैन मुनींनी घेतला सर्वात मोठा निर्णय
Jain Muni and Mohol
| Updated on: Oct 26, 2025 | 7:48 PM
Share

Jain Boarding Scam : पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीचे कथित गैरव्यवहार प्रकरण चांगलेच तापले आहे. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर याप्रकरणी गंभीर आरोप होत आहेत. मोहोळ यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप होत आहे. मात्र मोहोळ यांनी जैनमुनींची भेट घेत, माझा यामध्ये सहभाग नाही, हे मी वारंवार पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे. मी तुम्हाला न्याय मिळवून देईल, काही दिवसांत हा प्रश्न संपेल असं विधान केलं होतं. यानंतर आता जैनमुनींनी याबाबत आक्रमक भूमिका घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आमचा मोहोळ यांच्यावर विश्वास नाही, उद्या संपूर्ण देशात…

जैनमुनींनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी सर्वात मोठा निर्णय घेताना म्हटले की, ‘मंत्री आणि खासदार मोहोळ यांनी या ठिकाणी भेट देत मी तुमची समस्या सोडवेन असं म्हटलं आहे, मात्र समाजाला त्यांच्यावर विश्वास नाही. त्यामुळे उद्या (27) संपूर्ण देशात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आम्ही गावाखेड्यात मोर्चा काढू आणि अधिकाऱ्यांनी निवेदन देऊ.’

धंगेकरांनी वेगळं आंदोलन करू नये

रवींद्र धंगेकर यांच्याबाबत बोलताना जैनमुनी म्हणाले की, राष्ट्रीय माध्यमात मांजर नाचलं तरी व्हिडियो येतो, मात्र महावीर स्वामींचं मंदिर विकलं गेलं तरी राष्ट्रीय माध्यमं गप्प आहेत. राज्यातील चॅनल चांगलं काम करत आहेत. धंगेकर आंदोलनासाठी उत्साहित आहेत. त्यांचा आपला जोश चांगला आहे. एक तारीख च्या आधी डील नाही रद्द झाली नाही एकत्र आंदोलन करू. त्यांनी वेगळं आंदोलन करू नये.

मुरलीधर मोहोळ काय म्हणाले होते?

जैनमुनींची भेट घेतल्यानंतर बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले होते की, ‘मी या प्रकरणात सहभागी आहे, किंवा माझे कोणीतरी सहभागी आहे असे आरोप केले जात आहेत. परंतु माझा यामध्ये सहभाग नाही, हे मी वारंवार पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे. प्रत्येक समाजाचे गुरू असतात ते सर्वांसाठी वंदनीय असतात. त्यांचे दर्शन घेण्यासाठी मी येथे आलो आहे. मी जर दोषी असतो तर मी इथे आलोच नसतो. या सर्व विषयावर राजकारण झाले आहे, व्यक्तीगत राजकारणातून या गोष्टी घडत गेल्या, मी आपल्याला आश्वासित करतो की या प्रकरणात योग्य न्याय होईल. मी तुम्हाला न्याय मिळवून देईल, काही दिवसांत हा प्रश्न संपेल आपल्या हवा तसा हा विषय संपेल. प्रेमाला प्रेमाची साध दिली जाते, लोकप्रतिनिधी आणि खासदार म्हणून मला तुम्ही निवडून दिलं आहे. हा विषय संपवण्यासाठी तशी भूमिका घेण्यासाठी मी इथे आलो आहे.

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.