AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील महिला पोलिसांसाठी आनंदाची बातमी; आता फक्त आठ तासांची ड्युटी

Pune Police | यापूर्वी अमरावती आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांच्या कामाचे तासही कमी करण्यात आले होते. नागपूर शहरात महिला पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर आठ तास ड्युटीचा उपक्रम सुरू केल्यानंतर पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी इतर पोलिस घटकांनी या निर्णयाबाबत विचार करावा, अशी सूचना केली होती.

पुण्यातील महिला पोलिसांसाठी आनंदाची बातमी; आता फक्त आठ तासांची ड्युटी
पुणे पोलीस
| Edited By: | Updated on: Sep 25, 2021 | 9:30 AM
Share

पुणे: पुणे शहर पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण लवकरच कमी होणार आहे. कारण सोमवारपासून महिला पोलिसांना केवळ आठ तासच काम करावे लागेल. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. त्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे शहर पोलीस दलातील हजारपेक्षा जास्त महिला कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

यापूर्वी अमरावती आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांच्या कामाचे तासही कमी करण्यात आले होते. नागपूर शहरात महिला पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर आठ तास ड्युटीचा उपक्रम सुरू केल्यानंतर पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी इतर पोलिस घटकांनी या निर्णयाबाबत विचार करावा, अशी सूचना केली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण आणि अमरावती पोलिसांनीही महिला पोलिसांसाठी आठ तासांची ड्युटी जाहीर केली होती.

महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण

पोलीस दलात कर्तव्य करीत असलेल्या महिलांना बारा तास काम करावे लागते. महिला पोलिसांना कामाबरोबरच कौटुंबीक जबाबदारी पार पाडावी लागते. अनेक वेळा सण-उत्सव बंदोबस्त गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरातून अनेक वेळा 12 तासापेक्षा जास्त कर्तव्य बजावावं लागत. त्यामुळे त्यांच्या कौटुंबीक जबाबदारीवर आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलीस विभागाने महिलांच्या बारा तासाच्या ड्युटीचा कालावधी आता आठ तास केला आहे, अशी माहिती अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी दिली होती. आता महिलांना चार तासाची सवलत मिळाल्याने महिला कर्मचाऱ्यांमध्ये मोठा आनंद निर्माण झाल्याचेही त्यांनी म्हटले होते.

यशोमती ठाकूर यांच्याकडून स्वागत

महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याचा निर्णय अतिशय चांगला आहे. पोलीस महासंचालक पांडे आणि पोलीस दलानं केला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतेय, असं राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. महिलांबद्दल आणि कामांबद्दल त्यांना जो ऑलराऊंडमध्ये रोल प्ले करावा लागतो याची जाणीव होत आहे. हे आपल्या सर्वांच्या वर्तनात येत आहे. असाच सर्व विचार इतर मंडळींनी करावा, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. सर्व पोलीस ठाण्यांनी हा उपक्रम राबवावा, या निर्णयामुळे महिला पोलिसांना दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या:

जोपर्यंत शहरात भर चौकात खून होत नाही तोपर्यंत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही, पिंपरी चिंचवडच्या पोलीस कमिश्नरांचा अजब दावा

पुण्यात भर दुपारी थरार, मनोरुग्णाची 35 फूट उंच होर्डिंगवरुन उडी

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला घरचा आहेर, लाचखोरांना पाठीशी घातलं जात असल्याचा नगरसेविकेचा आरोप!

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.