AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anand Dave : पदाधिकारी शरद पवारांचं ऐकत नाहीत का? आनंद दवेंचा पुण्यात सवाल; जातीयवादप्रश्नी जितेंद्र आव्हाडांवर टीका

राष्ट्रवादी आणि जातीयता हा वाद मागील काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र ब्राह्मण महासंघाला खात्री होती, की राष्ट्रवादी जातीय राजकारण सोडणार नाही, म्हणूनच आम्ही ती भेट नाकारली होती, अशी टीका आनंद दवे यांनी केली आहे.

Anand Dave : पदाधिकारी शरद पवारांचं ऐकत नाहीत का? आनंद दवेंचा पुण्यात सवाल; जातीयवादप्रश्नी जितेंद्र आव्हाडांवर टीका
जातीयवादप्रश्नी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना आनंद दवेImage Credit source: tv9
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Jun 05, 2022 | 3:42 PM
Share

पुणे : या राष्ट्रवादीचे (NCP) करायचे काय? पदाधिकारी शरद पवार यांचे ऐकत नाहीत का, असा सवाल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. आम्ही जातीयवादी नाही, आम्ही सकारात्मक राजकारण करतो, असे पवार साहेबांनी पुण्यात परवा आम्ही न गेलेल्या ब्राह्मण बैठकीत सांगितले. तशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असेदेखील सर्वांसमोर मीडियाला सांगितले. ब्राह्मण महासंघाला खात्री होती, की राष्ट्रवादी जातीय राजकारण सोडणार नाही, म्हणूनच आम्ही ती भेट नाकारली होती, अशी टीका आनंद दवे यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्यावर केलेल्या टीकेचाही आनंद दवे यांनी समाचार घेतला आहे. यावरूनच त्यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केले आहे.

‘राष्ट्रवादीवर टीका’

राष्ट्रवादी आणि जातीयता हा वाद मागील काही दिवसांपासून सुरू आहे. राज ठाकरे यांनी याची सुरुवात केली. एकीकडे राष्ट्रवादी विशेषत: शरद पवार जात मानत नसल्याचे विविध पक्षांनी सांगितले तर दुसरीकडे राज ठाकरेंसारख्या नेत्यांनी मात्र यावर तोंडसुख घेणे सुरूच ठेवले. त्यातच शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाची बैठक बोलावली होती. काही ब्राह्मण संघटना मात्र या बैठकीला अनुपस्थित होत्या. आनंद दवे यांचीही संघटना यात सहभागी झाली नव्हती. त्यावर ते म्हणतात, की राष्ट्रवादी जातीयता सोडणार नाही, याची खात्री असल्यामुळेच या बैठकीला गेलो नाही. जितेंद्र आव्हाडांवरही त्यांनी टीका केली.

‘यांना पुरंदरेंचे पत्र मान्य नाही’

काल पुण्यात जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा पक्षाचे संस्कार दाखवले आणि स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली. यांना ना बाबासाहेब पुरंदरे यांचे पत्र मान्य आहे, ना ऑक्सफर्डचे, अशी टीका करत यांना जेम्स लेनचे स्पष्टीकरण मान्य नाही तसेच खरा इतिहासदेखील मान्य नाही. यांना हवे आहे फक्त जातीय तेढ आणि द्वेषाचे राजकारण, असा हल्लाबोल आनंद दवे यांनी केला आहे.

काय म्हणाले आनंद दवे?

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

माणूस मेल्यानंतर सगळे काही संपते. तो गेल्यानंतर जेम्स लेन जागा होतो. एक इतिहासकार बदनाम करून गेला. 20 वर्षे कोणीही यावर बोलले नाही. तो अमेरिकेतून मुलाखत देतो. ही माहिती त्याला कुणी दिली. ती जी माहिती आहे, ती बाबासाहेब पुरंदरे यांनीच पुस्तकात लिहून ठेवली आहे. हे जाहीरपणे बोलत आहे, असे आव्हाड म्हणाले होते. महाराष्ट्रात हिंदू-मुस्लीम वाद याच शिवचरित्राने केला, असा घणाघात काल जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर केला होता. तसेच पुरंदरे यांनी काळा इतिहास लिहिला, असेही आव्हाड म्हणाले होते.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?