AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ही दहशत थांबली पाहिजे’, 95 वर्षीय बाबा आढाव आक्रमक, विश्वजीत कदम यांच्या भेटीनंतर म्हणाले…

"1952 पासून निवडणुका पाहत आलो आहे. पण या निवडणुकीत जो प्रकार घडला आहे तसं कधी घडले नाही. पैशांचा धुमाकूळ घातला. भाऊ म्हणून शासकीय तिजोरीतून पैसा वाटला. या निवडणुकीमध्ये पैशांचा मोठा वापर झाला. हे जर फसवत असताना मी गप्प बसलो तर मी कसला कार्यकर्ता?", असं बाबा आढाव म्हणाले.

'ही दहशत थांबली पाहिजे', 95 वर्षीय बाबा आढाव आक्रमक, विश्वजीत कदम यांच्या भेटीनंतर म्हणाले...
95 वर्षीय बाबा आढाव आक्रमक
| Updated on: Nov 29, 2024 | 9:53 PM
Share

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं वयाच्या 95 व्या वर्षी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेष आंदोलन सुरु आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी बाबा आढाव यांच्या उपोषस्थळी जात भेट घेतली. यावेळी बाबा आढाव आणि विश्वजीत कदम यांनी प्रतिक्रिया दिली. “1952 पासून निवडणुका पाहत आलो आहे. पण या निवडणुकीत जो प्रकार घडला आहे तसं कधी घडले नाही. पैशांचा धुमाकूळ घातला. भाऊ म्हणून शासकीय तिजोरीतून पैसा वाटला. या निवडणुकीमध्ये पैशांचा मोठा वापर झाला. हे जर फसवत असताना मी गप्प बसलो तर मी कसला कार्यकर्ता? या निवडणुकीमध्ये मनमानी पद्धतीने पैशांची उधळपट्टी केली. पंतप्रधानांनी आदानींना पाठिंबा जाहीर केला. माजलेले भांडवलदार ठरवत आहेत की, या देशामध्ये कोणाची सत्ता असावी. लोकसभेला एक निकाल आणि विधानसभेला वेगळा निकाल हा चमत्कार कसाकाय घडला? स्वतःच्या खिशातून भाऊबीज साजरी करण्यापेक्षा सरकारी तिजोरीतून भाऊबीज साजरी केली. ही दहशत थांबली पाहिजे त्यासाठी आपण लढलं पाहिजे”, असं बाबा आढाव म्हणाले.

विश्वजीत कदम काय म्हणाले?

“बाबा आढाव जे उपोषण करत आहेत ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या लोकशाहीची ही लढाई आहे. सध्याची निवडणुकीची जी प्रक्रिया आहे त्यात पारदर्शकता नाही. यामध्ये लोकशाहीला कमकुवत केलं जात आहे. एका वेगळ्या दिशेला महाराष्ट्राच्या आणि देशाच्या निवडणुकीला नेलं जात आहे. ईव्हीएमबाबत महाराष्ट्राची जनता शंका उपस्थित करत आहे. जिंकलेल्या उमेदवाराला सुद्धा विश्वास बसत नाही की, आम्ही एवढ्या मताधिक्याने कसं काय निवडून आलो. लोकशाहीची निवडणूक पारदर्शक करायची असेल तर बॅलेट पेपरवरती येणाऱ्या काळामध्ये विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक झाली पाहिजे. तरंच महाराष्ट्रात लोकशाही टिकेल”, असं विश्वजीत कदम म्हणाले.

“जी जनता सहा महिन्यापूर्वी महायुतीच्या सरकारवर राग व्यक्त करते, या सहा महिन्यात नक्की असा काय चमत्कार घडला की महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीच्या विरोधात जाते? या निकालामध्ये गडबड आहे. यामुळे आमची मागणी आहे निवडणुका बॅलेट पेपरवरती झाल्या पाहिजेत”, अशी प्रतिक्रिया विश्वजीत कदम यांनी दिली.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....