AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : पक्ष फोडला तरी अजितदादांबद्दल शरद पवार यांच्या मनात काय?; युगेंद्र यांच्या प्रचारसभेत थेटच बोलल्याने उंचावल्या अनेकांच्या भुवया

Sharad Pawar on Ajit Pawar : दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. अजितदादा पक्ष, चिन्ह आणि समर्थकांसह महायुतीत सत्ताधारी झाले. राष्ट्रवादीसह पवार कुटुंबियात फूट पडल्याची आरोळी उठली. लोकसभेनंतर विधानसभेत त्यावर शिक्कामोर्तब झाले. पक्ष फोडला तरी अजितदादांबद्दल शरद पवार यांच्या मनात काय आहे, हे एका सभेनिमित्त समोर आले.

Sharad Pawar : पक्ष फोडला तरी अजितदादांबद्दल शरद पवार यांच्या मनात काय?; युगेंद्र यांच्या प्रचारसभेत थेटच बोलल्याने उंचावल्या अनेकांच्या भुवया
शरद पवार, अजित पवार
| Updated on: Nov 05, 2024 | 11:58 AM
Share

राज्यात शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. पवार कुटुंबियात फाटाफूट झाली. अजितदादा पक्ष, चिन्ह आणि समर्थकांसह सत्तेत सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी महायुती जवळ केली. महायुतीत तीन इंजिन लागले. लोकसभेनंतर आता विधानसभेतही पवार विरुद्ध पवार असा बारामतीच्या मातीत सामना रंगला आहे. एक बाजी शरद पवार यांनी मारली आहे. तर विधानसभेत अजितदादांचा (Ajit Pawar) पुन्हा कसल लागणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातच युगेंद्र पवार यांच्या प्रचार सभेत बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजितदादांविषयी केलेल्या एका वक्त्व्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. बारामतीमधील शिरसुफळ येथे त्यांनी मतदाराशी संवाद साधला.

राजकारणाचा वापर लोकांसाठी व्हावा

तुम्ही मला जेव्हा निवडून दिलं तेव्हा मी विधानसभेत गेल्यावर एखादी योजना इथे करता येईल का असा विचार केला होता. एका योजनेतून या भागात काहीसे पाणी यायला लागलं. दूध संघाची सुरुवात आम्ही केली ते नंतर १ लाख लिटर वर गेलं. आम्ही हे दूध पुण्यात पोहचवले. डायनॅमिक कंपनी बारामती मध्ये आली. तिथे ८ लाख दूध येतं आणि त्यावर प्रक्रिया होते. शेती संकटात असेल तर दुसरा जोड धंदा पाहिजे राजकारण फक्त सत्ता आणि निवडणुकीसाठी नाही. राजकारणाचा वापर लोकांच्या जीवनात झाला तर त्याचा उपयोग आहे, असे शरद पवार म्हणाले.

अजितदादांसंदर्भात या संदर्भात नाही तक्रार

तुम्ही ४ वेळा मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलं, २५ वर्ष मी बारामती मध्ये काम केलं. पुढची सत्ता अजित दादांच्या हातात दिली आणि निर्णय तुम्ही घ्यायचं सांगितलं. ३० वर्ष अजित पवारांनी कामं केलं, माझ्या मनात त्यांच्याबद्दल त्या संदर्भात कुठली ही तक्रार नाही, असे मोठे वक्तव्य शरद पवार यांनी केले. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुढची तयारी करायची असेल तर नेतृत्व तयार करावं लागेल.नवीन नेतृत्व तयार करायचं आहे म्हणून युगेंद्रची उमेदवारी दिली. मी मत मागायला आलो नाही, तुम्ही मला मतं द्यायला कधी काट कसर केली नाही. माझी निवडणूक असो, अजित दादा ची निवडणूक असो, सुप्रियाची असो तुम्ही कधी नाही म्हणाला नाहीत. लोकसभा कौटुंबिक राजकारणाची होती तरी तुम्ही सुप्रियाला मतदान केलं, असं ते म्हणाले.

१८ तारखेला बारामतीला सभा

युगेंद्रचे चिन्ह तुम्हाला माहिती आहे. या दिवसांचा उपयोग करा त्याचे चिन्ह लोकांपर्यंत न्या. १८ तारखेला शेवटची सभा बारामती मध्ये घ्यायला येईल. उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि माझी उद्या मुंबईत सभा आहे. त्यानंतर मी नागपूर मध्ये जाईल आणि तिथून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि शेवटी बारामती मध्ये येईल. राज्याची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. सगळीकडे येणं शक्य नाही, जेवढं जायला लागेल तिकडे जाईल. निवडणुकीचे काम हातात घ्या आणि सांभाळा, असं आवाहन पवारांनी यावेळी केलं.

Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक