AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टेंशन वाढवलं, महाराष्ट्रात H3N2 चा दुसरा रुग्ण दगावला

एमबीबीएसचे शिक्षण घेणार्‍या 23 वर्षीय तरुणाचा बुधवारी नगरमध्ये H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसमुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आता राज्यात दुसरा मृत्यू झाला आहे.

टेंशन वाढवलं, महाराष्ट्रात H3N2 चा दुसरा रुग्ण दगावला
| Updated on: Mar 16, 2023 | 1:49 PM
Share

पुणे : महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी आहे. महाराष्ट्रात सध्या 170 हून अधिक रुग्ण H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसने बाधित रुग्णांची संख्या आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये 73 वर्षीय वृद्धाचा H3N2 ने बाधित होऊन मृत्यू झाला आहे. यापूर्वी एमबीबीएसचे शिक्षण घेणार्‍या 23 वर्षीय तरुणाचा नगरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची आता चाचणी केली जाणार आहे. या प्रकारामुळे राज्याचे टेन्शन वाढले आहे.

कोणाचा झाला मृत्यू

पुणे जिल्ह्यातील पिंपरी- चिंचवडमध्ये H3N2 पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 8 मार्चला ताप सर्दी असल्याने रुग्ण पिंपरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु गुरुवारी उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. सध्या पिंपरी- चिंचवड शहरात ऍक्टिव्ह रुग्ण नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.

राज्यात संख्या वाढली

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक रुग्ण असून छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये रुग्ण आढळून येत आहे. राज्यात नगरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवडमध्येही एकाचा मृत्यू झाला.

आरोग्य विभाग अलर्ट

H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसचा मृत्यू झाल्याने आता आरोग्य विभाग अलर्ट होत असतांना नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. सर्दी ताप आणि खोकला अशी काही लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचे आहे. दुर्लक्ष न करता तात्काळ उपचार घेणे गरजेचे आहे.

सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान.
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया.